
डॉ.रॉय पाटणकर यांनी प्रशासन व पालिकेला मदत म्हणून क्वॉरोनटाईन रुग्णाकरिता दिले 100 बेडचे जॉय रुग्णालय
- by Adarsh Maharashtra
- Apr 06, 2020
- 947 views
मुंबई :( जीवन तांबे )मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याच्या भीतीने उपनगरांमधील खासगी डॉक्टरांनी आपल्याकडे सुरक्षित साधने नसल्याने कित्येक दिवसापासून आपले दवाखाने बंद ठेवले आहे. यामुळे सामान्य रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ते सामान्य आजाराकरिता पालिका व शासकीय रुग्णालयात गर्दी करत आहेत.
याच दरम्यान चेंबूर येथील एक खासगी डॉक्टर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पुढे आले असून त्यानी आपले 100 बेडचे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेला क्वारंटाईनसाठी दिले आहे.
मुंबई उपनगरातील चेंबूर येथील जॉय रुग्णालय हे नामवंत खाजगी रुग्णालय आहे.
या रुग्णालय पोटविकार तज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर चालवीत असून ते स्वतः या परिसरात गेली 25 वर्षे प्रॅक्टिस करीत आहेत.
त्यांनी शेजारीच झेन एकूण 100 बेडचे रुग्णालय नवीन सुरू केले आहेत.
जॉय रुग्णलाय काही कायदेशीर कारणास्तव बंद आहे.
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या विषाणूचा झोपडपट्टी तसेच इमारतीमध्ये शिरकाव झाल्याने नागरिक सध्या भयभीत झाले आहेत. प्रशासन, पालिका याकरिता रुग्णालयाची व्यवस्था करीत आहे.
मात्र क्वॉरोन टाईन केलेल्या रुग्णांना वेगळ्या व सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जागेची कमतरता येत असल्याने अनेक सामाजिक संस्था शालेय संस्थेचे खोल्या सध्या प्रशासन आपल्या ताब्यात घेत आहे.
त्यामुळे मुंबईतील संभाव्य आणि कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने संभाव्य रुग्णांना क्वारंटाईन करावे लागणार आहे. अशावेळी मुंबईत जागा अपुरी पडण्याचीही शक्यता आहे.
हाच विचार करून डॉ.रॉय पाटणकर यांनी प्रशासन व पालिकेला मदत करायचे ठेवविले त्यांनी आपले बंद असलेले जॉय रुग्णालय पालिकेला क्वारंटाईनसाठी दिले आहे.
प्रतिक्रिया:
डॉ. रॉय पाटणंकर
पोटविकार तज्ञ
जॉय रुग्णालय गेले 3 वर्षांपासून बंद आहे.
चेंबूर, शिवाजी नगर, धारावी परिसरा रुग्ण सापडत आहेत.
पालिकेला विलगिकरण रुग्णाकरिता कोणतीही रक्कम न घेता दिले आहे. आज पासून ते सुरू झाले आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम