
नेरळ शहारातील गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप!
नेरळ मंडळ अधिकारी धावले गोरगरीबांचे मदतीला!
- by Adarsh Maharashtra
- Apr 06, 2020
- 330 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड) ;- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील इतरत्र ठिकाणासह कर्जत तालुक्यांतही कर्जतचा उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी व कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळचे मंडळ अधिकारी माणिक सानप हे झपाटल्यागत काम करत असल्याचे दिसुन येत आहे. नेरळ शहरात गोरगरीब जनतेला मंडळ अधिकारी वेगवेगळ्या परीसरात जावुन अन्नधान्याचे वाटप करीत आहेत.
कर्जत तालुका दुर्गम तालुका आणि आदिवासी लोकसंख्या अधिक असलेला तालुका आहे. या तालुक्यांत रोजगारांचा संधी अधिक नसल्याने या तालुक्यांत हात मजुरी करुन अनेकजण उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र सध्या देशात लाॅकडाऊन असल्याने येथे रोजगार हाताशी नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोणीही उपाशी राहाता कामा नये याकरता सरकार प्रंचड प्रयत्नशील आहे. असे असतानाच अनेक शासकीय अधिकारी आपआपल्या परीसरात मदतीचा हात देताना दिसुन येत आहेत.
अशाच पद्धतीने कर्जतचे तहसिलदार श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाने नेरळचे मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी नेरळ गावातील अनेक गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे. अनेकांना सानप यांनी येथे अन्नधान्याचे वाटप केले असतानाच आज दुपारी नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयाचा आवारात सोशल डिस्टन्स पाळुन गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप केले आहे.
दरम्यान मंडळ अधिकारी यांनी अन्नधान्य वाटप केल्याने नेरळ परीसरातील अनेक गोरगरीबांना दिलासा मिळाला आहे. आज अन्नधान्य वाटप करताना सानप यांच्या समवेत पत्रकार धर्मानंद गायकवाड, कर्जतचे प्रदिप अहिरराव, नेरळ सजाचे कोतवाल अशोक भगत व अन्य उपस्थित होते. मंडळ अधिकाऱ्यांचा या उपक्रमाचे नेरळ परीसरात प्रंचड कौतुक होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम