
मंत्रालयामध्ये अधिकारी, कर्मचारी सह भेट देणार्यांंना फेस मास्क बंधनकारक; महाराष्ट्र सरकारचा नवा नियम
- by Adarsh Maharashtra
- Apr 06, 2020
- 404 views
मुंबई :भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहर सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. देशामध्ये सध्या १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने अनेकांवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात अवघ्या ५% कर्मचार्यांसह कामकाज सुरू आहे. मात्र कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता सरकारने मंत्रालयात येणार्या प्रत्येक व्यक्तीला फेस मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. सरकारी कार्यालयातील सारे कर्मचारी, ऑफिसर, व्हिजिटर्स यांना फेस मास्क घालणं पुढील काही महिन्यांसाठी बंधनकारक आहे.महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. तर शहरी भागात मुंबई आघाडीवर असल्याने आता खबरदारीचा उपाय म्हणून काही नियम कडक केले जात आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूर आणि इतर देशांप्रमाणेच लवकरच आपल्याकडेअही फेस मास्क घालणं बंधनकारक करण्याबाबतचे संकेत दिले होते. अमेरिकेमध्येही लोकांना बाहेर पडताना फेस मास्क घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन २५ मार्चला जाहीर केला. त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. मात्र या काळात नागरिकांना केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा होती. मात्र भाजीपाला, किराणा माल घेण्यासाठी अजुनही शहरी, ग्रामीण भागात गर्दी होत असल्याने आता नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणं बंधनकारक केलं जाऊ शकतं. १४ एप्रिलला लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर काय? हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. मात्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आणि स्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम