
गर्दीची ठिकाणे व नाक्यांवर आता ड्रोनची विशेष नजर राहणार
- by Adarsh Maharashtra
- Apr 05, 2020
- 930 views
मुंबई:कोरोनाचे राज्यातील थैमान नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असताना नागरिकांची मनमानी वर्तणूक त्यात अडसर ठरत आहे. विनाकारण रस्त्यावर जमावाने फिरणार्याचे प्रमाण कायम राहिल्याने करोनाबाधितांचा आकडा वाढत राहिला आहे. त्यांच्यावर आता ड्रोनच्या सहाय्याने कारवाई करून चाप लावला जात आहे.
राज्यातील रेल्वे पोलीस आयुक्तालय वगळता सर्व १० आयुक्तालयांना विशेष ड्रोन पुरविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती अधिनियम व बंदी आदेश तोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत. राज्य पोलीस मुख्यालयाच्या प्रशासन विभागाकडून शुक्रवारी ड्रोनचे १२ नग त्याच्या आवश्यक सामुग्रीसह वितरित करण्यात आले आहेत, कस्टम विभागाकडून ही अद्यावत सामुग्री मिळविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या विषाणूला लगाम घालण्यासाठी राज्यासह देशात २३ मार्चपासून लाँकडाउन केले आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय नागरीकांना घराबाहेर न पडण्यास मनाई केली आहे. तरीसुघ्दा अद्यापही काही प्रमाणात वाहनधारक व नागरिकांच्या ये-जा सुरूच आहैत. त्याशिवाय आपले मूळ गाव सोडून शहर व महानगरात नोकरी व अन्य कारणांनिमित्य स्थायिक झालेले नागरिकांनी आपल्या कुटुंबियासह गावाकडे मोर्चा वळविल्याने रस्त्यावरील गर्दी कमी होण्यात अडचण येत आहे. त्यामुळे कोरोना बाधिताचा आलेख चढत आहे. त्याला प्रतिबधासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे , सध्या आयुक्तालयांकडे उपलब्ध असलेल्या ड्रोनसह याचाही तात्काळ वापर करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी त्याबाबत सर्व आयुक्तांना दिले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम