वरळी कोळीवाड्यातील नागरिकांचं खुल पत्र , तिन्हीही ठाकरेना खुल पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

आमदार अदित्य ठाकरे 

मनसे प्रमुख्य  राज ठाकरे

विषय - वरळी कोळीवाड़्याची बदनामी काही माध्यम करत आहे 

वरळी कोळीवाड्याच कुणी वाली आहे का ? आम्हाला वाऱ्यावर सोडू नका , समस्त वरळीकरांकडून खुल पत्र 

मुंबईतील वरळी कोळीवाड्याची आणि कोळी बांधवाची बदनामी कऱणा-.या बातम्या काही मराठी न्यूज चँनेल चालवत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या अर्धसत्य दाखवणा-या आहेत . इथल्या परिस्थितीची आणि वरळीकरांशी न बोलता या चुकीच्या बातम्या दाखवणा-या माध्यामाचा आम्ही निषेध करतो. प्लिज बातमी दाखवताना त्याची शहानिशा करा 

वरळी कोळीवाड्यातील खरी परिस्थितीत काय ? 

वरळी कोळीवाड्यात सध्या कर्फ्युमुळे अत्यावश्यक सेवा बंद आहेत त्यात किराणा माल , दवाखाने , मेडीकल स्टोअर्स  आणि दूध या सेवाचा समावेश आहे 

 लहान मुलांना दूध नाही , पेशटंना दाखवायला दवाखाने नाहीत , पेशटला गोळ्या नाहीत . लोकांच्या घरात खायला अन्न नाही , पैसे आहेत पण किराणा मालाची दुकान बंद असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येत नाही 

कोळीवाड्यातील कोळी लोकांचा व्यवसाय पूर्ण पणे मासेमारी अंबलबून असतो त्याला देखील फटका बसला आहे 

परिस्थितीत सुरळीत करण्याचा थोडका प्रयत्न होतो परंतु तो पुरेसा नाही 

 प्रशासनाकडून कुठल्याही क्लिअर सुचना वरळीकरांना दिल्या जात नाही , हा कर्फ्यु किती दिवासाचा आहे . तो किती दिवस चालणार आहे त्यामुळे वरळीकर प्रचंड नाराज आणि संतप्त आहेत 

वरळी कोळीवाड्यात नागरिकं प्रशासनाला सहाकार्य करत आहेत परंतु आम्हाला विश्वासात घेतल जात नाही आहे . आम्हाला विश्वास घेऊन प्रशासन गोष्टी कराव्यात हि आमची विनंती आहे 

आम्हा वरळीकरांना वाऱ्यावर सोडू नका , आमचं पोट आमच्या धंद्यावर आहे . आम्ही धंदा लावत नसल्यामुळे आमच्याकडे दररोज  खर्चासाठीही पैसैही नाहीत . या प्रश्नी सर्व ठाकरे परिवारांनी लक्ष घालून हा वरळीकरांचा प्रश्न सोडवावा हि विनंती . हा कोळीवाडा नेहमी  मुंबईच्या मुळ माणसासोबत अन्याय होत आहे त्यांच्यावर तोडगा काढवा सर . या पत्रासोबत काही व्हिडीओ येथील परिस्थितीत सांगत आहेत ते जोडले आहेत ते ही पाहवं 

धन्यवाद 

समस्त वरळी कोळीवाडा नागरिक

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट