
कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी नेरळ पोलिसांचा विविध उपाययोजना; नेरळ पोलिसांचा अनोखा उपक्रम!
- by Adarsh Maharashtra
- Apr 02, 2020
- 969 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड);- रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शन आणि कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर तसेच नेरळचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांच्या विशेष सहकार्यांनी नेरळ पोलिसांनी कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी जन जाग्रुती कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे नेरळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार बाळासाहेब महादेव जाधव यांनी स्वत: गाणे लिहून त्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली आहे.
महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असणारे बाळासाहेब जाधव यांना गाण्याची आवड आहे. ते एक कुशल संगीतकार आणि गीतकार आहेत. महाराष्ट्रात गायन क्षेत्रात जाधव यांनी अनेकदा ठसा उमटविला आहे. देशात सध्या कोरोना व्हायरसने देश संकटात असतानाच येथे सरकार आणि विविध स्तरावरील प्रशासन कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना व जन जाग्रुती प्रयत्न करीत आहेत. असे असतानाच प्रशासनाला मदत व्हावी या उद्देशाने नेरळ पोलिस ठाणेचे अधिकारी आणि कर्मचारी नेरळ शहारात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.
नेरळ पोलिस ठाणेचे सहायय्क फौजदार बाळासाहेब जाधव यांनी स्वत: कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी एक गाणे तयार करून ते गाणे लोकप्रिय चालीवर गायन केले आहे. यापुर्वीही बाळासाहेब जाधव यांनी तत्कालीन ग्रुहमंत्री आर.आर. पाटील यांनी अंमलात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचा आपल्या गाण्यांमधुन प्रचार आणि प्रसार केला होता. त्यावेळी बाळासाहेब जाधव यांना महाराष्ट्र शाशनाने पुरस्कार देवुन गौरविले होते. तसेच जाधव यांना अनेक कला भूषण, कवी भूषण, मंत्रालय वार्ता सारखे सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत. तर सध्या बाळासाहेब जाधव यांच्या कोरोना व्हायरस संसर्ग टाळणे संदर्भातल्या गाण्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर आणि नेरळ परीसरात सुरु आहे.
दरम्यान नेरळ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नेरळ परीसरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रंचड सतर्क राहीले आहेत. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने नेरळ बाजारपेठेत आता गर्दीचे प्रमाण कमी होत असुन रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे नेरळ परीसरात कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी नेरळ पोलिसांचेही मोठे योगदान असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम