
रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाणेच्या हद्दीतील रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरही प्रचंड पोलिस बंदोबस्त!
नेरळचे सपोनि अविनाश पाटील हे प्रचंड सतर्क!
- by Adarsh Maharashtra
- Mar 27, 2020
- 1393 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील सीमेवर असणारे शेवटचे पोलिस ठाणे नेरळ पोलिस ठाणे आहे. या पोलिस ठाणेची हद्द जिथे संपते तेथून ठाणे जिल्ह्याची हद्द सुरू होते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी नेरळ पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक अविनाश पाटील हे प्रचंड सतर्क राहिले आहेत. रायगडचे पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल धेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळचे सपोनि अविनाश पाटील यांनी रायगड सीमेवर असणाऱ्या शेलु व कळंब परीसरात प्रचंड कडक बंदोबस्त लावला आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संचारबंदी घोषित करुन जिल्हाबंदी चे आदेश केल्यानंतर रायगड जिल्ह्यातही कडकपणे ही जिल्हा बंदी करणेतआली आहे. परीणामी रायगड जिल्ह्याबाहेर अनेकांना जा-ये करणे अशक्य झाले आसल्याने रायगड जिल्हयात बाहेरुन येणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आसुन रायगड जिल्ह्यात बाहेरुन कोरोना येणेची आता सुतरामही शक्यता नसल्याचे ठामपणे सांगणेत येत आहे.
सध्या संपुर्ण जगासह भारत देश सुद्धा कोरोना विषाणु व्हायरसने संकटात सापडला आहे. भारत सरकार आणि राज्य सरासर वेळोवेळी या व्हायरस पासून बचाव करण्यासाठी विविध सूचना नागरीकांना आणि प्रशासनाला करीत आहे. या सुचनांचा अंमल करण्याची सर्वस्वी मुख्य जबाबदारी पोलिस खात्यावर येवुन ठेपली आहे. पोलिसही रात्रंदिवस या कोरोना पासून देशांचे संरक्षन करण्यासाठी काम करीत आहेत. रायगड जिल्ह्यातही हा कोरोना व्हायरसचा शिरकाव होवु नये याकरता रायगड जिल्हा प्रशासन आणि रायगड पोलिस प्रशासन जनजाग्रुती करुन नागरीकांना सूचना करीत आहेत. रायगड जिल्ह्यात शासनाचा सुचनांचा आदर नागरीकही करताना दिसत आहेत. असे असतानाच आता जिल्ह्याबाहेरुन हा कोरोना कोणी रायगडात घेवून येवु नये याकरता रायगडचा विविध सीमांसह नेरळ पोलिस ठाणे हद्दीतही असणाऱ्या रायगडचा सीमेंवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करणेत आला असल्याचे दिसुन येत आहे.
विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यांच्या एका सीमेवर नेरळ पोलिस ठाणेची हद्द आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून व इतर भागातुन कोणीही रायगडात येवु नये याकरता नेरळ पोलिस ठाणेची जबाबदारी अधिक वाढल्याने याची दक्षता घेत नेरळ पोलिसांनी रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरील कळंब आणि शेलु येथील सीमेवर प्रचंड कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आसल्याचे दिसत आहे.
दरम्यान राज्यांत सध्या सुमारे १३५ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामधे अद्याप रायगड जिल्हा कोरोना पासून सुरक्षित असल्याचे दिसुन येत आहे. ही सुरक्षितता कायम अशीच राहावी याकरता रायगड मधील जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन तसेच इतर सर्व संबंधित प्रचंड सतर्क राहीले आहेत. रायगड जिल्हंतायीत नागरीकही प्रशासनाचा विविध सूचना व आदेशांना प्रतिसाद देत असल्याने सुरक्षित असलेल्या रायगड जिल्ह्याला या संकटापासुन सुरक्षित ठेवण्यासाठी शासन प्रचंड प्रयत्नशील आसल्याचे दिसुन येते. त्यामुळे रायगडचा सीमेवरुन कोणी कोरोनाग्रस्तांनी जिल्ह्यांत प्रवेश करु नये याकरता जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध सीमांसह नेरळ पोलिस ठाणे हद्दीतही सीमेवर नेरळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी प्रंचड चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे राजगडाचा सिमा पॅक झाल्या आहेत. त्यामुळे रायगड बाहेरुन जिल्ह्यात कोरोना येणार नसून जिल्ह्यातील नागरीकांनी घरातच थांबावे, पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही नेरळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे. त्यामुळे रायगडकरही घरीच बसणे पसंत करत असल्याचे सांगणेत आले आहे.
रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असणाऱ्या रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर शेलू परीसरात नेरळ पोलिस ठाणेचा पोलिसांनी असा कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला अाहे. परीणामी या रायगड जिल्हाचा सिमेवरुन आता थेट जाणे, येणे बंद केल्याचे छायाचित्रांत दिसत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम