मुंबईकरांनो कोरोना से डरोना

कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या पुन्हा केलेल्या दोन चाचण्या निगेटीव्ह

१२ पैकी ८ रुग्णांना डिस्चार्ज 

गेल्या २४ तासात मुंबईत ४ , मुंबई बाहेरील १ असे ५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

कस्तुरबा रुग्णालयात ६५ वषीॅय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी): राज्यासह मुंबईत कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पहाता मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निमाॅण झाले आहे. परंतु मंगळवारी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे कोरोना पाॅझीटीव्ह १२ रुग्णांच्या दोन वेळा केलेल्या चाचण्या निगेटीव्ह आल्याने  १२ पैकी ८ रुग्णांना मंगळवारी घरी सोडण्यात आल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या उप कार्यकारी अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी सांगितले. जरम्यान, दुबईहुन आलेल्या ६५ वषीॅय कोरोनाग्रस्त रुग्णांचा कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी रात्री उशीरा मृत्यू झाल्याचेही ते म्हणाले.  

मंगळवारी दिवसभरात बाह्य रुग्ण ओपीडीत ८४१ जणांची तपासणी केली असता त्यात ९४ संशयित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत ४ तर मुंबईबाहेरील १, असे ५ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले आहेत. मुंबईत कोरोना पाॅझीटीव्ह ५८ रुग्ण असून पालिकेच्या कस्तुरबासह विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.

पालिका प्रशासन येत्या २४ तासांत हेलपलाईन नंबर जाहीर करणार असून संशयित रुग्णांच्या घरी जाऊन मंगळवारी पालिकेच्या डाॅक्टरांनी लाळीचे नमुने घेतले आहेत. लवकरच त्यांचा अहवाल येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, कोणालाही त्रास वाटत असेल, तर त्यांनी जवळील किंवा पालिकेच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले आहे. 

राज्यात कोरोनाचा चौथा बळी;६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाचा मृत्यू

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात करोनावर उपचार घेणाऱ्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच तो यूएईहून १५ मार्च रोजी भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबादेत आणि नंतर मुंबईत आला होता. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले होते. २३ मार्चला त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट