
महाराष्ट्र 'लॉकडाऊन' करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून* *सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम
- by Adarsh Maharashtra
- Mar 23, 2020
- 414 views
144 कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते. जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देतो. जमावबंदी लागू केल्यानंतर 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमू शकत नाहीत. तसेच शस्त्र घेऊन जाण्यास देखील बंदी असते.
कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकतात. त्या व्यक्तीला कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत अटक करण्यात येते. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्याला 1 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र या शिक्षेसाठी जामीन मिळतो.
सीआरपीसी म्हणजेच भारतीय दंड विधान (Code of Criminal Procedure, 1973) भारतातील गुन्ह्यांसाठी कायदे आहेत. हे 1973 ला पारित करण्यात आले व 1 एप्रिल 1974 मध्ये लागू करण्यात आले.एखाद्या गुन्ह्यात आरोपी आणि पिडितासाठी जी प्रक्रिया राबवली जाते ती सीआरपीसीमध्ये देण्यात आलेली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम