कर्जतमध्ये बदलापुर येथिल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार; तालुका हादरला; पोलिस करतात कसुन तपास

नशिब बलवत्तर म्हणुन राम लिये बचावले!

  कर्जत:- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत काल रात्री हाहाःकार पसरला आहे. कर्जत तालुक्यांतील डिकसल परीसरात काल रात्री बदलापुर येथिल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱी राम लिये यांच्यावर कोण्या अज्ञात ईसमांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. नशिब बलवत्तर असल्याने राम लिये या हल्ल्यातुन बचावले अाहेत. मात्र या घटनेने रायगड जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यात प्रंचड खळबळ माजली आहे.

          या बाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार बदलापुर येथिल राष्ट्रवादीचे पदाधिकारी राम लिये यांच्या मुलीचा काल वाढदिवस असल्याने ते कार्ला येथे एकविरा मातेचा दर्शनासाठी गेले होते. ते येथुन परतत होते. लिये बदलापुर येथे जात असताना त्यांनी डिकसल येथे नाश्ता घेण्यासाठी गाडी थांबविली. त्यानंतर राम लिये हे डिकसल येथुन बदलापुर येथे जाणेसाठी निघाले होते. त्यावेळी दोन मोटारसायकल वरुन येणाऱ्या तिघांनी लिये हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीवर बंदुकीने गोळ्या झाडून हल्ला चढविला.

          मात्र प्रसंग सावधान राखुन लिये यांनी आपले सिट मागे घेवुन आपल्या ड्रायव्हरला गाडी पुन्हा मागे फिरावयाला लावली. मात्र हल्लेखोरांची गोळी लिये यांच्या वाहानाचा कोचेतुन आरपार गेली आहे. तसेच पुढूनही गोळी वाहनाचे बोनेट आणि काचेला लागुन बाहेर पडली आहे. एकविरा आईची क्रुपा म्हणुन राम लिये सुदैवाने बचावले आहेत. यावेळी गोळीबार झालेल्या लिये यांच्या गाडीमघ्ये त्यांची पत्नी, मुली व मित्र बसले होते. त्यामुळे लिये यांच्या कुटुंबात घबराहाटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची खबर बदलापुर शहारात पोहोचताच बदलापुर करांनी एकच गर्दी नेरळ पोलिस ठाण्यात केली होती. बदलापुरचे राष्ट्रवादीच् नेते कॅप्टन आशिष दामले यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते.

        या घटनेची खबर येताच नेरळ पोलिस ठाणेचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेचे गांभिर्य ओळखुन रायगडचे पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी येथे भेट दिली आणि या गोळीबार घचनेचा तपासाबाबत नेरळ पोलिसांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे नेरळ पोलिस ठाणेचे पोलिस अधिकारी अविनाश पाटली हे रायगड  पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. ही हल्ला राजकीय वैमनस्यातुन झाला असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते राम लिये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. यापुर्वाही २०१६ मध्ये राजकीय वैमनस्यातुन राम लिये यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगणेत आले.

          दरम्यान बदलापुर नगरपालिकेचे निवडणुक काही महीन्यात होत असतानाच घडलेला हा प्रकाराने बदलापुरचे राजकारणात बंदुकीची गोळी मिसळल्याचं बदलापुरचे रात्जकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा निषेध राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोंदविला आहे. या घटनेतील आरोपांचा लवकरच मुसक्सा आवळण्याचा विश्वास नेरळ पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर राम लिये यांची भक्ती आणि आई एकविरा मातेचा शक्तीनेच राम लिये यांचा बचाव या हल्ल्यातुन झाल्याची चर्चा नेरळ पोलिस ठाणे बाहेर सुरु होती. नेरळचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील हे या प्रकरणी अधिक तपास करीत असुन आरोपींचा कसुन शोध घेत आहेत.





रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट