
दहावीचा २३ मार्च रोजी होणारा शेवटचा पेपर पुढे ढकलला
दहावीचा सोमवारचा पेपर पुढे ढकलला, राज्य सरकारचा मोठा निर्णय
- by Adarsh Maharashtra
- Mar 21, 2020
- 960 views
मुंबई:दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. मात्र आता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. नवी तारीख ३१ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दहावीचा एकच पेपर उरला होता. जो २३ मार्च रोजी होणार होता.मात्र करोना व्हायरसची रुग्ण संख्या वाढल्याने आणि खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. इतके दिवस दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये बदल होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता वर्षा गायकवाड यांनी दहावीचा पेपर पुढे ढकलला आहे.
्सोमवारी 23 मार्च रोजी भूगोल आणि सामाजिक शास्त्र -2 चा पेपर होता. मात्र, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणारा पेपर आता 31 मार्च नंतर निर्णय घेतला जाणार आहे.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
राज्यातील प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. यासंदर्भातल्या निर्णयाची घोषणा ही ३१ मार्चनंतर केली जाईल.
दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शालेय परीक्षांसदर्भात शुक्रवारीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 1 ते 8 वी पर्यंत सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम