
कोरोना - गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी भुयारी मार्गातील फेरीवाल्यांवर कारवाई
- by Adarsh Maharashtra
- Mar 18, 2020
- 812 views
मुंबई (प्रतिनिधी) : जगभरात कोरोना व्हायरसच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असे आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी पालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सब वे मधील होणारी गर्दी कमी करण्यासाठी येथील फेरीवाल्यांना हटवले आहेत.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचे महाराष्ट्रात 42 तर मुंबईत 15 रुग्ण आहे. मुंबईत एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने आणि महापालिकेने गर्दीमध्ये जाऊ नये, अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून पालिका आयुक्तांना दिलेल्या अधिकारानुसार आयुक्तांनी गर्दीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यालय या दरम्यान असलेल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी दुकाने आणि फेरीवाले असल्याने गर्दीही मोठया प्रमाणात असते. ही गर्दी कमी करावी म्हणून पालिका आयुक्तांना साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करत भुयारी मार्गातील फेरीवाले हटवण्यात आले आहे. यामुळे भुयारी मार्ग मोकळा झाला असून त्याठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी कमी झाली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम