
करोनामुळे कुक्कुटपालनावर उपासमार
- by Adarsh Maharashtra
- Mar 16, 2020
- 748 views
मुंबई (प्रतिनिधी) :कोंबडी खाल्याने करोना होतो असा खोटा मेसेज व्हाट्सअँप वरून पसरल्याने अनेकांनी चिकन खाणे बंद केले आहे. चीन मध्ये करोनाची लागण झाल्यानंतर त्या देशात कोंबड्या मारून टाकल्याचे व्हिडिओ सर्वत्र पसरू लागल्याने भारतात सुद्धा मांसाहारी लोकांनी कोंबडी खाणे तसेंच अंडी खाणे बंद केल्याने पोल्ट्री व्यवसायिकावर उपासमारीची पाळी आली आहे.
शेती बरोबर जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन करणारे लाखोंनी शेतकरी वर्ग असून अनेकांना आपल्या कोंबड्या मारून टाकावे लागत आहे. अशा वेळी या शेतकऱ्यांना सावरले पाहिजे.या अगोदर सुद्धा ब्लर्ड फ्लू हा अंडी खाल्यामुळे होतो असा गैरसमज पसरविण्यात आला.
तेव्हाही पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्याना अनेक समस्याला तोंड दयावे लागले आणि आताही कोंबडयांमुळे करोना हा रोग होतो अशी अफ़वा पसरवून लाखो कुक्कटपालन करणाऱ्या व्यवसायिकानवर धंदा बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
करोना रोगाचा विस्तार कोंबडयांमुळे होत नाही याची शाश्वती शासनाने जाहिरात द्वारे देऊन बुडीत चाललेल्या कुक्कुटपालन व्यवसायाला नवसजवीनी द्यावी.
दत्ता श्रावण खंदारे धारावी
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम