
मेट्रोच्या कामासाठी १५९ झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
- by Adarsh Maharashtra
- Mar 16, 2020
- 420 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई मेट्रो आणि इतर शासकीय कामांच्या आड येणारी १५९ झाडे तोडण्यास आणि १०७ झाडे पुनर्रोपित करण्यास आज पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. यामुळे मेट्रोची कामे लवकर होतील असा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. तर झाडे तोडण्यास आमचा आजही विरोध आहे. मात्र मेट्रो स्टेशनच्या जवळ असलेले रस्ते आणि नाल्याच्या कामासाठी झाडे तोडण्यास आम्ही संमत्ती दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संगितले.
मुंबई मध्ये मेट्रोची कामे सुरु आहेत. मेट्रो कामासाठी उभारण्यात येणाऱ्या कारशेडसाठी नुकतीच झाडे तोडण्यात आली. त्याचे पडसाद उमटले होते. झाडे तोडण्यासाठी आमचा विरोध आहे असेच शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. त्यानंतरही भाजप आणि इतर सदस्यांच्या जोरावर वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये झाडे तोडण्यास मंजुरी ज्ञेयात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा मेट्रो २ व ७ च्या कामासाठी १५९ झाडे तोडण्याची तर १०७ झाडे पुनर्रोपित करण्याची मंजुरी वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती. झाडे तोडण्यास शिवसेनेचे विरोध असल्याने सर्वांचे आज झाडे तोडण्याबाबत शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये झाडे तोडण्याच्या प्रस्तावाचे भाजपाने स्वागत केले आहे. मुंबईच्या विकासाच्या आड येणारी आणि आवश्यक असलेली झाडे तोडली पाहिजेत. झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने मेट्रोचे काम वेगाने होईल असे भाजपा नगरसेवक अभिजित सामंत यांनी म्हटले आहे. तर आज झाडे तोडण्यासाठी आलेले प्रस्ताव हे मेट्रो स्टेशनच्या बाजूचे रस्ते आणि नाले आदी कामासाठी होते. त्यामुळे आमचा विरोध मोट्रोच्या कामासाठी नाही. आमचा विरोध झाडे तोडण्याला आहे. आवशयक असतील तितकी झाडे वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळेच झाडे तोडण्यासाठी आलेल्या प्रस्तावामधील झाडांची संख्या कमी झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. पुनर्रोपित झाडांची काळजी पालिका आणि मेट्रोच्या एमएमआरसीएल यांनी घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम