भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात

उद्घाटनाच्या औपचारिकतेपेक्षा सेवा सुरू होणे महत्त्वाचे किनारपट्टीच्या भागात जलवाहतूक सुरू करण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीमध्ये अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे.कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, असे कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या सेवेस त्यांनी आज आपल्या शुभेच्छाही दिल्या.

 सेवेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून मांडवा जेट्टी येथे १५० कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर येथून देखील लवकरच जलवाहतूक सुरू करण्याची तयारी आहे. भाईंदर ते डोंबिवली अशा जलवाहतुकीच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळून दोन वर्षांत तीही सेवा सुरू होईल. एकूणच जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार वाढविला जाईल, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर १९ किमी असून या जलवाहतुकीने एक तासात कापता येते. रस्त्याने जाण्यासाठी चार तास लागतात. रो पॅक्सची क्षमता एकावेळी ५००प्रवासी आणि १४५ वाहने नेण्याची आहे

             रो रो सेवेची माहिती

भाऊचा धक्का ते मांडवा रो -पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात आले आहे .केंद्र शासनाची  सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून ५०-५०टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो-पॅक्स सेवेसाठी एमटूएम जहाज मुंबईत दाखल झाले आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट