
दुसरे अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संम्मेलन नागपूर येथे
संमेलनाचे अध्यक्षपदी डाँ.भाऊ लोखंडे यांची निवड.... सुजित मुरमाडे
- by Adarsh Maharashtra
- Mar 15, 2020
- 967 views
नागपूर:- जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ व विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ व.१२ एप्रिल २०२० रोजी नागपूरातील साई सभागृह, व्होक्काहार्ट येथे दुसरे अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ. भाऊ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या संमेलनाचे उदघाटन सकाळी १० वाजता करण्यात येईल. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष वनराई फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी आहेत. तर संमेलनाचे उदघाटक महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आहेत. या संमेलनासाठी भारताचे रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री व नागपूर चे खासदार नितिन गडकरी,गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे संमेलनासाठी प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित राहतील.
दि. १२ मार्च २०२० रोजी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यात दिल्ली चे सुप्रसिद्ध विचारवंत शांतीस्वरुप बौद्ध, पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे व सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, नागपूर या तीन नावावर महामंडळाच्या बैठकीत सविस्तर विचारमंथन झाले. त्यात महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ. भाऊ लोखंडे यांच्या नावावर एकमताने संमती दिली. नागपुरात संमेलन असल्यामुळे नागपूरच्याच साहित्यकाचा या निमित्ताने गौरव व्हावा असे बरेच पदाधिकाऱ्यांचे मत होते. शेवटी डॉ. भाऊ लोखंडे यांना या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा ऐतिहासिक मान मिळाला.दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवर वैचारिक मंथन होणार असून भारतातील नामवंत साहित्यिक,विचारवंत, पत्रकार, कवी, नाटककार सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या तयारीसाठी विविध कमिट्या स्थापन केल्या आहेत. ११ एप्रिल ला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे व १४ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पर्वावर हे संमेलन होत आहे. तसेच मुकनायकचे शताब्दी वर्ष असल्यामुळे या संमेलनात त्या विषयावर वैचारिक मंथन होणार आहे. या संमेलनात ज्येष्ठ संपादक व पत्रकारांना मुकनायक शताब्दी राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात येणार आहे. तसेच अनेक लेखकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला जाणार आहे. यावेळी पत्रपरिषदेत उपस्थित प्रा. दीपककुमार खोब्रागडे,प्रा. विवेक खूनकर,डॉ. सुशील गाडेकर, प्रगती पाटील-नगरसेविका आदी होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम