
कोरोनाचा धसका
फेरीवाला धोरण आटोपते घेत महापौरांनी नगरसेवकांकडून मागवल्या लेखी सूचना
- by Adarsh Maharashtra
- Mar 14, 2020
- 1425 views
मुंबई (प्रतिनिधी): कोरोना व्हायरसच्या प्रसार जगभरात झाला आहे. मुंबईमध्ये या व्हायरसचे चार तर राज्यात १९ रुग्ण आढळले आहेत. त्याचा धसका मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबई महापालिकेत फेरीवाला धोरणावर चर्चा सुरु असताना ही चर्चा अर्धवट गुंडाळत सभागृहाचे कामकाज आटोपते घेण्यात आले आहे. सभागृहात सर्वच नगरसेवकांना या विषयावर बोलण्याची इच्छा असताना कामकाज आटोपते घेत नगरसेवकांनी आपल्या सूचना आणि मते लेखी स्वरूपात द्यावीत अशा सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस हजारो लोकांचे बळी घेत मुंबईपर्यंत पोहचला आहे. पालिका सभागृहात फेरीवाला धोरणावर चर्चा करण्यात आली. गेले काही दिवस प्रशासनाकडून अनके विभागात फेरीवाले बसवण्यासाठी मार्किंग करण्यात येत आहे. आपल्या इमारतीसमोर, विभागात फेरीवाले नको म्हणून मुंबईकरांनी आणि राजकीय पक्षांकडून विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृहात सर्वच नगरसेवक गंभीर चर्चा करत होते. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी चर्चा आटोपती घेत सभागृह स्थगित केले. यामुळे अनेक नगरसेवकांना आपली मते आणि सूचना मांडता आलेल्या नाहीत. यामुळे आता याबाबत सूचना पत्राद्वारे मला द्याव्यात मी महापौर म्हणून त्याची दखल प्रशासनाला घ्यायला लावेल असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
याबाबत बोलताना, फेरीवाला धोरणाचे नियोजन होत नाही तो पर्यंत ते जाहीर करू नये. न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला धोरण राबवण्यासाठी टाऊन वेन्डिंग कमिटी असली पाहिजे. त्यात नगरसेवकांचा आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असला पाहिजे अशी सर्वच नगरसेवकांची मागणी आहे. शाळा कॉलेज हॉस्पिटल या पासून फेरीवाले दूर असले पाहिजे अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे. तर काहींनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांसाठी फेरीवाला हब,
आठवडी बाजार सुरू करावे अशी मागणी केली आहे असे महापौरांनी सांगितले. शहरातील नागरिकांचा फुटपाथवर चालण्याचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे. त्याच वेळी फेरीवाल्यांनाही त्यांचा व्यवसाय करायला मिळाला पाहिजे. फेरीवाला ही मुंबईचीच नाही तर देशाची समस्या असल्याचे महापौरांनी सांगितले.
मध्यमवर्गीय व गरीब नागरिकांना फेरीवाला जवळचा वाटतो. त्यांच्याकडून ते आपल्याला हव्या असलेल्या वस्तू विकत घेतात. त्यामुळे फेरीवाल्यांना अचानक काढू शकत नाही. फेरीवाला सर्वानाच हवा आहे मात्र तो कोणाला आपल्या बिल्डिंगखाली नको आहे. फेरीवाला हा काही बाहेरचा नागरिक नसतो. तो राज्याचा नागरिक असतो. यामुळे प्रशासनाशी चर्चा करून फेरीवाले आणि नागरिक या दोन्ही घटकांना न्याय द्यायचा आहे असे महापौरांनी सांगितले. पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी करण्यात आलेल्या मार्किंगबाबत बोलताना नगरसेवकांनी याबाबत चर्चा केली आहे त्यात काही चुकीचे असेल तर ते प्रशासनाला बदलावच लागेल असे महापौर म्हणाल्या.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम