कुटुंबाला जबाबदार धरा: चिमुकलीसह जोडप्याची आत्महत्या

कल्याण ग्रामीणमधील वाकलण गावात आज सकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आमच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आत्महत्या करत आहोत, आमच्या आत्महत्येला आमच्या कुटुंबीयांना जबाबदार धरावे, अशी चिठ्ठी लिहून नंतर ही चिठ्ठी व्हॉट्सअॅपवरून कुटुंबीयांना पाठवून पती, पत्नी आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे कल्याण ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवली (प्रतिनिधी) :  कल्याण ग्रामीणमधील वाकलण गावात आज सकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आमच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आत्महत्या करत आहोत, आमच्या आत्महत्येला आमच्या कुटुंबीयांना जबाबदार धरावे, अशी चिठ्ठी लिहून नंतर ही चिठ्ठी व्हॉट्सअ पवरून कुटुंबीयांना पाठवून पती, पत्नी आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे आत्महत्या ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 

                                                                                                                                                                                                                                                                                    आज पहाटे ५ वाजता शिळडायघर येथील वाकलण गावात ही घटना घडली. शिवराम पाटील, त्यांची पत्नी दीपिका पाटील (वय ३५) आणि मुलगी अनुष्का पाटील (वय ३) अशी मृतांची नावं आहेत. पाटील कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी त्यांच्या आत्महत्येला कुटुंबाला जबाबदार धरले आहे. 'कुटुंबातील इतर लोकांना त्रास देण्यासाठी आम्ही आत्महत्या करत आहोत. आमच्या आत्महत्येस घरातील सगळ्या जणांना जबाबदार धरावं', असा मजकूर या चिठ्ठीत लिहिल्यानंतर त्याचा फोटो काढून ही चिठ्ठी कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवरून त्यांनी पाठवली आणि त्यानंतर या तिघांनी गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

या चिठ्ठीत १३ जणांची नावं लिहिण्यात आली आहेत. हे सर्वजण आमच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचं म्हटलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असं चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांना ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्या १३ जणांची चौकशी करण्यात येणार आहे. त्याशिवाय शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असून या आत्महत्येमागचं नेमकं कारण उलगडण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आमचं एक पथक या प्रकरणाचा तपास करून एफआयआर दाखल करून घेईल, असं पोलीस उपायुक्त एस. बुरसे यांनी सांगितलं.                                                                                                                                                                                                                                                                                                बायकोचे दागिने दान करा

या सुसाइड नोटमध्ये पाटील यांनी आमच्या आत्महत्येनंतर पत्नी दीपिकाचे सर्व दागिने दान करण्यात यावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच संपत्तीच्या वादातून आम्ही आत्महत्या करत आहोत, असंही या चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या जोडप्याने आधी मुलीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी गळफास लावून स्वत:ला संपवल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं.
 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट