
दक्षिण मुंबईतील पाणी प्रश्न, बिडीडी चाळ पुनर्विकास प्रश्नामुळे उमेदवार चिंतीत
- by Adarsh Maharashtra
- Apr 19, 2019
- 1255 views
मुंबईत अनेक मतदारसंघात सध्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा वेग आला असताना दक्षिण मुंबईच्या मतदारसंघात सध्या पाणी प्रश्न पेटला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातील काळाचौकी येथील जिजामाता नगर येथे रहिवाशांना गेल्या सहा महिन्यांपासून भेडसावत असलेला पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. जिजामाता नगर येथे होणार्या अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे येथील त्रस्त नागरिकांनी मंगळवारी मध्यरात्री भायखळा राणीबाग येथील थेट महापौर निवासस्थानावर धडक देत आक्रमक पवित्रा धारण केला, तर सोमवारी रात्री येथील नागरिकांनी दक्षिण मुंबईचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी रात्री दीड वाजता धडक दिल्याने याठिकाणी ताण तणावाचे वातावरण पसरलेे. दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी प्रश्न जिकरीचा झाला आहे.तर येथील रहिवाशी रोज स्थानिक आमदार अजय चौधरी आणि स्थानिक नगरसेवक दत्ता पोंगडे यांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी भेट घेत आहेत. परंतु अजून काही हा पाणी प्रश्न सुटला नसून नागरिक हवालदिल झाले आहेत. जिजामाता नगर , काळाचौकी या भागात सहा महिन्यांपूर्वी संध्याकाळी 8 ते 11 वाजता या वेळेत पाणी येत होते. मात्र सहा महिन्यांपासून महापालिकेने येथील पाणी सोडण्याच्या वेळेत बदल केला आहे. नव्या वेळेनुसार आता याठिकाणी 9.30 ते 11 वाजेपर्यंत पाणी कमी दाबाने सोडण्यात येते. एकीकडे पाणी प्रश्न पेटलेला असतानाच दक्षिण मुंबईत बीडीडी चाळीतील रहिवाशांनी पुर्नविकासाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा धारण केल्याचे चित्र पहायला मिळाले. बीडीडी चाळीच्या पुर्नविकासाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने स्थानिक रहिवाशी हवालदिल झाले आहे. ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी नुकतेच महायुतीच्या प्रचारासाठी येथे दाखल झालेले उमेदवार अरविंद सावंत यांना याठिकाणी प्रवेश नाकारला. जोपर्यंत पुर्नविकासाचा प्रश्न सुटत नाही. पुर्नविकासाच्या करारावर स्वाक्षरी होत नाही. तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असे फलकच या परिसरात ठीक ठिकाणी लावले आहेत. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणाव पसरला होता. पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम