शिवसैनिकांचा नारा 'एकच स्पीरीट नो किरीट': सोमय्या विरोधात शिवसेना आक्रमक

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला आहे. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी  सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल आहे. या सर्व घडामोडीवरून ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार मातोश्रीवरूनच ठरणार हे नक्की झाले आहे.

आजचा दिवस सोमय्या यांच्यासाठी अधिकच अडचणीचा ठरला. प्रथम मातोश्रीने त्यांची भेट नाकारली त्यानंतर सुनिल राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहिर केल्याने सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होईल अशी शक्यता आहे.  दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्या बाबतचा निर्णय  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मिळून घेणार असल्याचे समजते.
त्याआधी जर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केली होती. काहीही झाले तरी सोमय्या यांना पराभव करु असेही राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या या घोषणेमुळे सोमय्या यांना अडचणीत आणखी भर पडली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरी ईशान्य मुंबईतील उमेदवारांवरुन अद्याप गोधळ आहे. शिवसेनेने या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला आहे. स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या नावाला विरोध केला आहे.भाजपने जर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. गेल्या चार वर्षात सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत शिवसैनिकांचा छळ केला आहे. त्यामुळे आमचा विरोध भाजपला नाही तर सोमय्या यांना आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपची युती आहे. पण जर ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होईल. भाजपने अन्य कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या बाजूने असू असेही राऊत म्हणाले.सोमय्या यांना उमेदवारी मिळालीच तर गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर अपक्ष म्हणून उमेदारीचा अर्ज दाखल करु, असे राऊतांनी सांगितले. आमचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे सोमय्या यांना उमेदवारी मिळणार नाही, असे ही ते म्हणाले.यामुळे शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांना विरोध २०१७ मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान तसंच यापूर्वीही किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेनेवर अनेकदा टक्केवारी घेण्यावरून टीका करण्यात आली होती. मुंबई महापालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतेही काम दिले जात आहे. वांद्र्यांच्या साहेबांना टक्केवारी जाते, असा थेट आरोप मातोश्रीवर केल्याने किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिकांची तीव्र नाराजी आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट