
लोकशाही मोडीत काढणा-या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रगतशील समाजवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज - डॉ.भालचंद्र मुणगेकर
- by Adarsh Maharashtra
- Jan 08, 2019
- 1559 views
मुंबई: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आंबेडकरी चळवळीतील तसेच प्रगतीशील व समाजवादी विचारांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी मंगळवार,दि.८ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह, नायगाव येथे सभा आयोजित केली होती.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ.भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून मोदी सरकारकडून देशाची राज्यघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. देशात सध्या आणीबाणीचे वातावरण आहे. ही अघोषित आणीबाणी आहे. २०१९ मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर निवडणूक पुन्हा होईल की याची शाश्वती देता येणार नाही. असे करून भारताची राज्यघटना मोडीत काढून लोकशाही संपवण्याचा भाजपचा डाव आहे. अशावेळी सगळ्या लोकशाहीवादी, प्रगतशील समाजवादी सहकाऱ्यांनी एकत्र येऊन या संविधान विरोधी शक्तींशी सामना करणे आवश्यक आहे.
या सभेस शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य करीत समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम