मुंबई येथील जयहिंद महाविद्यालयावर कारवाही करण्यात यावी; राज्य सरकारने गठित केलेल्या समितीचा अहवाल जाहिर
- by Adarsh Maharashtra
- Jan 08, 2019
- 894 views
कुलाबा:
गत चार वर्षापासून मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष आदित्य शिरोड़कर यांच्या
मार्गदर्शनाखाली मनविसे विभाग अध्यक्ष वैभव शिंदे उपाध्यक्ष संतोष
गांगुर्ड़े यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे महाराष्ट्र एज्युकेशनल
इंस्टिट्यूटनल प्रोहिबिशन ऑफ कैपीटेशन फि एक्ट 1987 च्या अनुसंघाने राज्य
शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने मुंबई स्वायत्ताप्राप्त झालेल्या जयहिंद
महाविद्यालयावर त्रि सदस्यीय समिती गठित करण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाला
दिले होते. समितीचे कामकाज पूर्ण होऊन जयहिंद महाविद्यालयावर कारवाही
शिफारसी अहवाल मुंबई विद्यापीठ,राज्य शासन सहसंचालक उच्चशिक्षण
विभागाला(मुंबई)सादर केला.व याची एक प्रत मनविसे विभाग अध्यक्ष वैभव शिंदे
यांना दिली आहे. समितीचे अहवालात जयहिंद महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाची
परवानगी न घेता विद्यार्थीकडून वायफाय च्या नावाखाली एकहजार रुपये शुल्क
असे एकूण ९७७५ रुपये विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आले होते.गठित
समितीच्या पड़ताळणीमध्ये ही बाब सिद्धही झाली.मनविसे च्या पाठपूराव्यामुळे
जयहिंद च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे.प्राचार्य डॉ.अशोक वाडीया व
व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाहीची मागणी मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर
यांनी केली.
वरील अधिनियमाचा वापर मुंबई
विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच होणार असून त्याचे स्वागत मनविसे उपाध्यक्ष
संतोष गांगुर्डे,संतोष धोत्रे, वैभव शिंदे,सुनील गावडे आणि रोहन यांनी
केले.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम