तीर्थक्षेत्र ओणी आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सवाचे भव्य आयोजन!

राजापूर - सालाबाद प्रमाणे याहीवेळेस कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जगप्रसिद्ध गंगातीर्थ पासून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र ओणी येथील स्वामी गगनगिरी महाराजांचे आश्रमांत गुरुपौर्णिमा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने शनिवार  दिनांक २० जूलै ते रविवार दिनांक २१ जूलै असे २ दिवस हा धार्मिक सोहळा सुरू राहणार  असून यानिमित्ताने आश्रमांत भजन-कीर्तन-प्रवचन, नामस्मरण होमहवन-भंडारा तसेच ग्रंथप्रकाशन कार्यक्रम व परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराजांचा जन्मदिन आदि धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. 

या धार्मिक सोहळ्यात शनिवार दिनांक २० जूलै रोजी  सायंकाळी स्वामी उल्हासगिरी महाराजांचा जन्मदिन साजरा करण्यात येणार असून या जन्मदिनाचे औचित्य साधून उल्हासगिरी महाराजांच्या  आध्यात्मिक प्रवासातील काही महत्वपूर्ण घटना तसेच काही दिव्य अनुभव या वरती आधारित पद्यमय स्वरूपात ओवीबद्ध "उल्हासगिरी सुमन "या नावाचा ग्रंथ तयार करण्यात आला असून त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे.या ग्रंथाचे रचनाकार श्री गणेश गणपत कुलकर्णी हे सुद्धा या प्रसंगी उपस्थित राहणार असून सर्व भक्तांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या साक्षीने प्रकाशन करण्यात येईल.नंतर स्वामी उल्हासगिरी महाराजांचे पाद्यपूजन, औंक्षण,व महाआरती करण्यात येईल.नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल

दि २१ जुलै, रविवार रोजी  गुरुपौर्णिमेनिमित्त श्री.गुरूपुजनाचा सोहळा संपन्न होईल या दिवशी  पहाटे काकड आरती, सकाळी मंगळ आरती, त्यानंतर  स्वामी गगनगिरी महाराजांच्या  पादुकांवरती अभिषेक करण्यात येईल, तसेच प्रकाशित "उल्हासगिरी-सुमन"या ग्रंथातील अध्यायाचे वाचन करण्यात येईल.ठीक दुपारी १२ वाजता होमहवन,महाआरती,व तदनंतर महाप्रसाद देण्यात येईल. सायंकाळी स्थानिक भजनी मंडळाचे भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.नतंर आरती झाल्यावर सर्वाना महाप्रसाद देण्यात येईल. याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या साधू- संतमंडळींचा सत्कार समारंभ संस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे असे तीर्थक्षेत्र ओणी आश्रम प्रमुख प.पू.श्री.उल्हासगिरी महाराज यांनी सांगितले आहे.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट