नाट्यरसिकांसाठी पर्वणी; " मृणालताई नाट्यकरंडक-२०२२ " राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची घोषणा

 मुंबई : एकांकिका स्पर्धा विश्वात प्रतीष्ठेची समजली जाणारी तसेच हौशी आणि होतकरू कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 'मृणालताई नाट्यकरंडक' एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. समाजकारण आणि राजकारणात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या, जनतेत ‘पाणीवाली बाई‘ अशी ओळख असलेल्या समाजसेविका आणि गोरेगावच्या माजी आमदार आदरणीय मृणालताई गोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली ४ वर्षे, मृणालताई नाट्यकरंडक ही खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाचे स्पर्धेचे ५ वे वर्ष असून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन सोहम थिएटर्स अंतर्गत केले जाते. सुदेश सावंत हे स्पर्धेचे मुख्य आयोजक असून संतोष वाडेकर आणि गिरीश सावंत हे समन्वयक आहेत. प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे हे या स्पर्धेचे मार्गदर्शन करणार आहेत.



 अनेक वर्षांपासून या स्पर्धेला नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जवळपास  ४५ ते ५० संघ दरवर्षी सहभाग घेतात. परंतु, यावर्षी फक्त ३६ संघच सहभागी होऊ शकतील असे काही बदल आयोजकांतर्फे करण्यात आल्याचे सुदेश सावंत यांनी सांगितले. गतवर्षी नागबादेवी कलामंचाची ‘मौनांतर’ने बाजी मारली होती तर, कलांश थिएटरची ‘बारस’ ही एकांकिका द्वितीय पारितोषिक पटकाविले होते. यावर्षी चुरशीच्या स्पर्धेत कोणती एकांकिका विजयी ठरेल हे औत्सुक्याचे ठरेल.
मृणालताई नाट्यकरंडक प्राथमिक फेरी दिनांक १५, १६, १७ डिसेंबर २०२२ रोजी केशव गोरे सभागृह, गोरेगाव येथे होणार आहे. तर अंतिम फेरी दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे होणार आहे.स्पर्धा प्रवेश नोंदणी १० डिसेंबर २०२२ पर्यंत असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता प्राथमिक फेरीचे वेळापत्रक कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोजक सुदेश सावंत यांना ९८२१३५५२६४ क्रमांकावर संपर्क करावा.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट