
मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय,कारमध्ये 'हे' फिचर्स आता बंधनकारक!
- by Adarsh Maharashtra
- Dec 30, 2020
- 1205 views
नवी दिल्ली, : गाड्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारने आता आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये दोन्ही बाजूने एअर बॅग्स लावणे आता बंधणकारक असणार आहे, असा आदेशच रस्ते, परिवहन मंत्रालयाने काढला आहे. या निर्णयामुळे गाड्यांच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्ह आहे.राज्य परिवहन मंत्रालयाने याबद्दल एक अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार, या पुढे देशातील प्रत्येक कार उत्पादक कंपन्यांना कारमध्ये चालक आणि त्यांच्या बाजूने असलेल्या सीटवर एअर बॅग्स देणे बंधणकारक असणार आहे.
1 एप्रिल 2021 पासून या आदेशाची अंमलबाजवणी केली जाणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या प्रत्येक कारमध्ये तुम्हाला चालकासह बाजूच्या सीटवर सुद्धा एअर बॅग्स मिळणार आहे.तसंच, जी वाहनं सध्या बाजारात येण्यास तयारी झाली आहे, त्या वाहनांमध्ये 1 जून 2021 पर्यंत एअर बॅग्स सुविधा कार उत्पादक कंपन्यांना द्यावी लागणार आहे.
कार चालक आणि त्याच्या बाजूच्या सीटवर जर दोन्ही बाजूने एअर बॅग्स दिली तर कारच्या उत्पादनात खर्च वाढणार आहे. परिणामी याचे पडसाद हे कारच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 'जर कारच्या दोन्ही बाजूने एअर बॅग्स दिले तर कारच्या किंमतीत 4 हजार ते 6 हजार रुपये वाढ होण्याची शक्यता आहे', असं कार उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.याआधाही कारमध्ये एअर बॅग्स देणे बंधणकारकच होते. पण, चालकाच्या समोरील सीटवर एअर बॅग दिली जात होती. काही कार उत्पादक कंपन्या या दोन्ही बाजूने कारमध्ये एअर बॅग्सची सुविधा देत होते. पण, आता कारच्या समोरील दोन्ही सीट्स समोर एअर बॅग्स द्यावीच लागणार आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम