संत गाडगेबाबा कविरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने रज्जाक शेख सन्मानित

अहमदनगर (प्रतिनिधी) : शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य  तथा राष्ट्रीय एकता चालक मालक युनियन श्रीरामपूर यांच्यावतीने  श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी साहित्यिक गजलकार रज्जाकभाई  शेख यांना राज्यस्तरीय "राष्ट्रीय संत गाडगेबाबा कवीरत्न" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.इच्छामणी लॉन्स  येथे झालेल्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अद्यक्ष डॉ. शिरीष लांडगे,आगारप्रमुख राकेश शिवदे,सहाय्यक उपनिरीक्षक शाम गायकवाड, डॉ बाबुराव उपाध्ये,डॉ.गुंफाताई कोकाटे,ह.भ.प.बनसोडे महाराज,शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,पत्रकार लक्ष्मण चेमटे, शब्दगंध साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष मिराबक्ष शेख,चालक युनियनचे तालुकाध्यक्ष रफिकभाई शेख,ग्रामीण साहित्यिक आनंदा साळवे ,मुजीब शेख यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन  रज्जाक शेख यांना गौरविण्यात आले.  रज्जाक शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या चारशे पेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.कथा व लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. राज्यभरातून विविध काव्यसंमेलनात  त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे. शालेय स्तरांवरील विविध नाटिका बसवून जिल्हा स्तरावर पारितोषिक मिळाले आहे. चालता बोलता काव्यात बोलू, चला पाहूया काव्य करून, माझं ऐका कला मंच ,माझं गाणं, प्रेरणादायी गितमंच, असे विविध उपक्रम शाळेत राबविले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खोकर नावाच्या एका छोट्याशा खेड्यात जन्म झालेल्या शेख सरांना  लहानपणापासून गाण्याचे वेड. शिक्षकी पेशा स्वीकारताना शाळेत विद्यार्थ्यांना कविता लवकर पाठ व्हायला हवी म्हणून स्वतः च्या हलक्याफुलक्या  चाली लावून कविता पाठांतर करून घेतल्या. आतापर्यंत लातूर येथे ज्ञानतीर्थ पुरस्कार, नागपूरहून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुण्यातून संत एकनाथ स्मृतिगौरव पुरस्कार, अहमदनगर हून ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार, शिर्डीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, ठाण्याहून प्रेरणा    उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यासारखे विविध सामाजिक संस्थाकडून सोळा  शिक्षक पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहे.

शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आतापर्यंत अनेक वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून कविता,कथा ,लेख व गझल यांना प्रसिद्धी मिळाली आहे.प्रवरा  कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर व्याख्यान, कविता व मुलाखतीचे प्रसारण झालेले आहे.त्यांच्या कवितांना युट्युब, एसीबीएन न्युज,सी9 न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स ,भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रम सादरीकरण केले आहे.वर्डसामना शब्दरसिक क्रांतिसूर्य,लक्ष्मीपुत्र, गोंदण,ग्रामसेवा,आसमंत काव्यप्रेमीचे,भगवानबाबा आदी दिवाळी अंकात तसेच त्यांच्या दर्जेदार कविता प्रतिलिपी,स्टोरीमिरर,लागीर झालं या ऍपवर सापडतात.ते जीवन गौरव शैक्षणिक मासिक सहसंपादक ,शब्दविद्या दिवाळी अंक उपसंपादक या पदावर साहीत्य चळवळीचे काम पाहतात .त्यांनी आतापर्यंत पंच्याहत्तर कविसमेलनाच्या मंचावर कवितांचे सादरीकरण केले आहे. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे काव्यक्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा आतापर्यंत पंच्याहत्तर वेळा व्यासपीठावर गौरव करण्यात आला आहे.लहान मुलांना कवितांची मेजवानी देण्यासाठी "काव्यदरबार" या बाल दिवाळी अंकाचे संपादन केले आहे.आपल्या उत्तम लेखणीद्वारे राज्यातील विविध वर्तमान पत्रातून कोरोना जागृती करण्यासाठी आपल्या तीस ते पस्तीस कवितांना प्रकाशित करून आरोग्य व कोरोना यांच्या भयंकरतेची कल्पना मांडली. राज्यातील विविध वृत्तपत्रातून "खेळू करू शिकू" या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली.सध्या शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना मनोरंजक अशा राज्यभरातून गाजलेल्या नामवंत शंभर कवींच्या बालकविता एकत्र करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत 'काव्यदरबार' हा दिवाळी बालकाव्य विशेषांक उपलब्ध करून दिलाआहे. या साहित्य पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

संबंधित पोस्ट