
लव्ह जिहादच्या पिपाणीएैवजी समान नागरी कायद्यासाठी नगारे वाजवा-शिरवडकर
- by Adarsh Maharashtra
- Nov 24, 2020
- 1895 views
मुंबई(प्रतिनिधी) - एकीकडे देशाचे गृह राज्यमंत्री संसदेत सांगतात की, 'लव्ह जिहाद' या संकल्पनेला कायद्यात कोणतेही स्थान नाही व केंद्रीय तपास यंत्रणाकडून एकही गुन्हा याप्रकरणी दाखल होऊ शकलेला नाही. त्यामुळे आधी लव्ह जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल.असे असताना आता काही मंडळी "लव्ह जिहाद" ची पिपाणी वाजवून महाराष्ट्रात विनाकारण समाजात दुफळी माजवून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत ही दुदैवी बाब म्हटली पाहिजे अशी खंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली व पिपाण्या वाजविणाऱ्यानी समान नागरी कायद्याकरता नगारे वाजवावे असे आवाहन केले.
आज देशात कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. पाक-चीनच्या खुरापती वाढल्या आहेत. सीमेवर वीर जवान शहीद होत आहेत. आर्थिक मंदिची लाट आहे. बेरोजगारी वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. महागाई वाढत आहे हे गंभीर प्रश्न असताना नको त्या पिपाण्या वाजवून, डबडी वाजवून विनाकारण गर्दी जमवून काय साध्य केले जात आहे ते कळत नाही.
आज देशात अनेक मंत्री-पुढारी-अभिनेते-क्रिकेटपटू-सर्वसामान्यांनी मुसलमान किंवा हिंदु मुलीशी-मुलाशी लग्न केले आहे त्यांचे संसार सुखेनैव चालले आहेत. आज देशात जे काही महिलांवर अत्याचार झाले ते लव्ह जिहादमुळे झालेले नाहीत. या देशाला तसे पहाता "समान नागरी कायद्याची" गरज आहे त्यासाठी कोणी ढोलकी वाजवताना दिसत नाहीत; हिंदुत्वाच्या नावानी सत्तेपुरता बेगडी डंका पिटायचा.एकीकडे गोमास विक्रिला बंदी म्हणत अराजक पसरवायचे अन् दुसरीकडे गोवा किंवा ईशान्ये कडील काही राज्यात गोमांसाची खुली विक्री करायची पालघर साधूहत्येचे राजकारण करायचे व अन्य राज्यातील साधुंच्या हत्येबाबत मिठाच्या गुळण्या घ्यायच्या. काश्मिरात मेहबुबा मुक्तींशी सत्ता स्थापन करायची,मोदीमुक्त हिंदुस्थान करा म्हणणाऱ्या बिहारच्या नितीश कुमारांशी सत्ता स्थापना करायची,अन् महाराष्ट्रात सेनेने सत्ता स्थापन केली तर त्यांना बेईमान म्हणायचे ही कोणती नीतीमुल्ये?अशी खंत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम