अक्कलकोट रामपूरातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला मदतीचा धनादेश

तर काळजी करू नका सरकार तुमच्या सोबतमुख्यमंत्र्याचे नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांना आश्वासन....

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगवी खुर्द व सांगवी बुद्रुक या पुलाची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्या सोबत आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली. तसेच 11 शेतकऱ्यांना प्रत्येकी 95100 रुपयांचे धनादेश सुपूर्द केले.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्‍यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच या भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करण्यासाठी आले. मात्र शेतकऱ्यांची मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी. या वेळी नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. सहा दिवस झाले आमची घरे पाण्यात आहोत. अक्कलकोटच्या लोकांनी आमच्या साठी जेवणाची व्यवस्था केली. आमच्या गावाचं तत्काळ पुनर्वसन करा.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागताला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि माजी आमदार दिलीप माने हे उपस्थित होते. कोरोनामुळे उर्वरित पदाधिकाऱ्यांना विमानतळाबाहेर थांबवण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत आदी उपस्थित होते

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट