सात महिन्यांनी लेडीज डब्यात गजबज, घटस्थापनेला महिलांसाठी लोकलचे दार उघडणार

महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही

मुंबई : तब्बल सात महिन्यांनी मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात पुन्हा एकदा गजबज ऐकायला मिळणार आहे. कारण घटस्थापनेला महिलांसाठी लोकलचे दार उघडणार आहे. राज्य सरकारने आता महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. 

अनलॉकिंगदरम्यान सर्व काही सुरळीत होत असताना मुंबई लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र राज्य सरकारने आता महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे २२ मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर मनसेसह अनेकांनी मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणी लावून धरली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलची वाहतूक २२ मार्चपासून बंद करण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा होती. जून महिन्यात टप्प्याटप्प्याने अधिक कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट