
बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडें आमने-सामने
- by Adarsh Maharashtra
- Oct 07, 2020
- 1918 views
मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदान हळूहळू जवळ येत चालले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची लगबग सुरु झाली आहे. शिवसेनेनेही आता बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार असून, अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधातही शिवसेना उमेदवार देणार आहेत. तो उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदसत्यात आहे.मात्र, ही निवडणूक चुरशीची होणार असे एकंदर चित्र आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली. “सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आलं. लोकांना कळतंय यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता. तरीही सूडबुद्धीचं राजकारण केलं गेलं. आम्ही आता बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करणार आहोत. बिहार निवडणुकीत आम्ही ५० जागा लढवत आहोत. २०१५ ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतं शिवसेनेनं घेतली होती,” अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी पदाचा राजीनामा देऊन जेडीयूमध्ये प्रवेश केलाआहे. गुप्तेश्वर पांडेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलं. गुप्तेश्वर पांडे बक्सर जदयूच्या तिकीटावर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. “डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता हे सर्वांनी पाहिलं होतं. या पदावर राहून असं वक्तव्य करणं हे पांडेंना न शोभणारं होतं. पण आमचा मावळा त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पांडेंना महाराष्ट्राची ताकद कळेल, आम्ही त्यांच्यासमोर उमेदवार देत आहोत,” असेही अनिल देसाई म्हणाले होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम