शरद पवार पाठीमागच्या बाजूने भाजपला सपोर्ट

मुंबई: केंद्र सरकारनं नुकतीच अतिशय महत्वाची तीन विधेयकं सादर केली आहेत. बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक, अत्यावश्यक वस्तू व सेवा सुधारणा कायदा आणि करार शेती विधेयक अशी ही तीन विधेयकं आहेत. केंद्र सरकारनं सादर केलेल्या या विधेयकांवरुन देशात चांगलाच गदारोळ उडाला आहे. ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं केंद्र सरकार सांगत आहे. मात्र, या विधेकाविरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत.

केंद्र सरकारनं सादर केलेली ही विधेयकं शेतकऱ्यांच्या पूर्ण विरोधी असल्याची विरोधी पक्षातील नेत्यांचं म्हणनं आहे. मात्र, ही विधेयकं राज्यसभेत सादर होताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील महत्वाचा घटक असणारे शरद पवार चर्चेला अनुपस्थित होते.त्यामुळे शरद पवार या विधेयकात केंद्र सरकारला पाठींबा देत आहेत का?, असा प्रश्न सातत्यानं विचारला जात आहे.

देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं असणाऱ्या विधेकांवेळी शरद पवारांनी अशी भूमिका घेतल्यानं विरोधी पक्षातील नेत्यांनी पवारांवर सडकून टीका केली आहे. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्येही पवारांविषयी संभ्रम तयार झाले आहेत. अशातच आता भाजप नेते नितेश राणे यांनी पवार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

केंद्र सरकारनं सादर केलेल्या नवीन विधेयकांविषयी महिती देण्यासाठी नितेश राणे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. यावेळी राणे यांनी कृषी विधेयकांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. 'ये अंदर कि बात है, शरद पवार हमारे साथ है,' असं विधान नितेश राणे यांनी यावेळी केलं आहे.तसेच राणे यांनी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी राज्यसभेत घेतलेल्या भुमिकेवरही भाष्य केलं आहे. प्रफुल पटेल राज्यसभेत बोलले खरे मात्र त्यांनी विधेयकांला विरोध केला नाही. प्रफुल पटेल यांनी केवळ सभात्याग केला, असं नितेश राणे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या कृषी विधेयकांवरून राज्यसभेत प्रचंड गोंधळ उडाला होता. विरोधी पक्ष नेत्यांनी या विधेयकांवरून राज्यसभेतील माईक तोडले, कागदपत्रे फाडत धक्काबुक्की केली, असं अभूतपूर्व नाट्य राज्यसभेत यावेळी घडलं होतं. मात्र, राज्यसभेत विरोधकांना न जुमानता सरकारनं प्रचंड गोंधळात हे विधेयक मंजूर करून घेतलं आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट