अमेरिकेत शाळा उघडल्या,९७ हजार मुलांना कोरोनाची लागण,जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू

वॉशिंग्टन, ९ ऑगस्ट :भारतात आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.सध्या देशभरात कोरोना मोठ्या विकोपाला पोहोचला असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मध्ये केंद्र सरकार विषाची परीक्षा घेतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा, कॉलेज आणि मॉलसारख्या गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण आता जगभरातील वेगवेगळ्या देशांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी अमेरिकेत जुलैच्या शेवटच्या 15 दिवसांत सुमारे 97,000 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सने एका अहवालात ही आकडेवारी जाहीर केली.

अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेत एकूण 50 लाख संक्रमित लोकांपैकी सुमारे 3 लाख 38 हजार मुले आहेत.ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी शाळा उघडण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ जुलैमध्येच कोरोना विषाणू मुळे अमेरिकेत सुमारे 25 मुलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांपासून कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे आणि सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन शाळा उघडल्या पाहिजेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांच्या पालकांना हा पर्याय दिला जात आहे की, त्यांनी मुलांना शाळेत किंवा रिमोट लर्निंगकडे पाठवावे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट