
यशवंत सेनेच्या दणक्याने मेंढपाळाची तात्काळ सुटका
कहो दिलसे यशवंत सेना फिरसे ..
- by Adarsh Maharashtra
- Jul 31, 2020
- 843 views
सोलापूर : दि ३०/७/२०२० गुरुवार कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी विजय रानगे, भगवान हजारे, सर्जेराव हजारे,गुंडाप्पा शेळके, बाबासो शेळके, कार्तिक शेळके वळीवडे, अजित बोराडे, महादेव लांडगे, मधू बोराडे, महे तुकाराम रेवडे हुन्नुर शिवाजी वळकुंचे उचगाव हे मेंढपाळ आपल्या शेळया मेंढ्या घेऊन दुजारपुर ता.सांगोला जिल्हा सोलापूर येथे माळरानावर आपल्या मेंढ्या चारत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडवून मे़ंढपाळ व मे़ंढरा़ना पकडून (तीस हजार)३० हजार रुपये दिल्या शिवाय सोडणार नाही अशी धमकी देऊन मेंढपाळ यांना अडवून ठेवले होते.अशी माहिती मेंढपाळ विजय रांनगे व कृष्णत रेवडे गडमुडशिंगी यांनी फोनवरून दिली आणि साहेब काही तरी करून मेंढपाळ यांना सोडवा असे सांगितले. लगेचच विजय रानगे या मेंढपाळाच्या मोबाईलवर परत फोन करुन लगेचच सविस्तर माहिती घेतली तर तिथे कोणत्याही प्रकारची झाडे अथवा वनविभाग यांनी लावलेली रोपवाटिका नसताना माळरानावर मेंढपाळ यांना का अडवले ? असे विचारताच... मजोर झालेले कर्मचारी स्वतः चे नाव अथवा फोन वर बोलेनात फक्त पैसे द्या मग सोडतो असे फक्त बोलत.
शेवटी संजय वाघमोडे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष कोल्हापूरचे मा.श्री. दिपक गडदे सोलापूर जिल्हा यशवंत सेना अध्यक्ष यांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन लगेचच सोलापूर जिल्हा वन कार्यालयात जाऊन घडलेला गंभीर प्रकार वरिष्ठांना सांगितला मेंढपाळाना मदत करून तात्काळ सोडण्यात यावे असे सांगितले.दिपक गडदेसाहेब जेवता जेवता उठून लगेचच सोलापूर वन कार्यालया तील वरीष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन घडलेला गंभीर प्रकाराची देऊन मेंढपाळ यांची यशवंत सेना स्टाईल एक रुपया ही न देता मुक्तता केली. या कामी बंडगर मँडम, डॉ.देशमुख मँडम व्यवस्थापकिय संचालक सांगोला सुतगिरण, सागर माने,जुनोनी,व रामचंद्र कबाडगे, या़चे मोलाचे सहकार्य मिळाले
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम