डोंबिवली ते बदलापूर पट्ट्यात कोरोनाचा हॉटस्पॉट,स्वतंत्र आयएएस अधिकारी नियुक्त करण्याची मागणी

डोंबिवली :(श्रीराम कांदू) डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतचा पट्टा हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस कोव्हीड - 19 ने बाधित झालेल्या आणि मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या एकीकडे वाढत चालली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन किंवा अनलॉक करूनही त्याचा फारसा परिणाम होऊ शकत नाही. लॉकडाऊनमध्येही खरेदीच्या बहाण्याने बिनदिक्कत घरबाहेर फिरताना दिसत आहेत. अशा भयानक परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी डोंबिवली ते बदलापूर दरम्यान शासनाने स्वतंत्र व सक्षम आयएएस अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी पुढे आली आहे.

 या संदर्भात आगरी युथ फोरम तथा अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीचे निवेदन धाडले आहे. राज्यात मार्च महिन्यापासून कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी व नागरिकांच्या भल्यासाठी त्याला प्रतिबंध करण्याकरिता सतत लॉकडाऊन घेतला जात आहे.तथापी कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर अंबरनाथ, बदलापूर व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक, विशेषतः तरुण वर्ग किराणा सामान, दूध, औषध, इत्यादी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्याचा बहाण्याने बिनदिक्कत बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळे ज्या हेतूसाठी लॉकडाऊन घेतला आहे तो हेतू साद्य होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात तर परिस्थिती अजूनच भयावह आहे. त्यामुळे डोंबिवली ते बदलापूर पट्ट्यातल्या शहर व आसपासच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा, डॉक्टर, सफाई कामगार यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी या पट्ट्यात उच्चस्तरिय स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी. जेणेकरून येथील सर्व यंत्रणा ना केंद्रित करण्यास मदत होईल व याभागात रुग्णांसाठी औषधोपचार, अँबुलन्स, यासारख्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यास मदत होऊ शकते. तसेच कल्याण-डोंबिवली व आजूबाजूचा ग्रामीण भाग आज कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे या भागातील अनेक तरुणांसह वयोवृद्धांच्या मृत्यूने ही शहरे हदरून गेली आहेत. सर्व नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीने प्रयत्न करत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी मुंबईतील धारावी, तसेच मालेगाव येथील प्रशासनाने उपाय करून ज्या पद्धतीने कोरोनवर मात केली त्याच धर्तीवर या भागाही सत्यता पडताळून तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. 

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व आजूबाजूच्या ग्रामीण भागांसाठी उच्चस्तरिय स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह मुंबईतील धारावी व मालेगाव पॅटर्नची या भागात अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने ताबडतोब कठोर पावले उचलून संबंधित अधिकारी वर्गाला आदेश देऊन सर्व भाग कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आगरी युथ फोरम तथा अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट