
आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले,78 रुग्णांचा मृत्यू
- by Adarsh Maharashtra
- Jun 29, 2020
- 887 views
मुंबई,:आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. राज्यात गेल्या 48 तासात 78 रुग्णांचा मृत्यू झाला असून आधीच्या कालावधीतील 103 आणखी रुग्णांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा 4.48 टक्के इतका आहे.
राज्यात आज 5257 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 169883 अशी झाली आहे.आज नवीन 2385 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 88960 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73298 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज राज्यात 2385 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 88,960 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 52.37 टक्क्यावर पोहोचलं आहे. सध्या राज्यात 5,74,093 लोकं होम क्वारंटाईन असून 37,758 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या 73,298 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रत लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम