मुलं चिडचिड करतायेत मग हे करा...

डॉ. मुबाशीर मुझमिल खान, सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट, मदरहूड हॉस्पिटल, खारघर

पनवेल:खरं तर प्रत्येक मुलात काही प्रमाणात आक्रमकता असतेच...पण ती प्रमाणातच असावी लागते. या गोष्टीचा अतिरेक व्हायला नको. लहान मुलं मस्तीखोर असतातच हे स्वभाविक आहे. परंतु, एखादी गोष्ट मनाप्रमाणे न झाल्यास हिसंक बनणे हे चुकीचं आहे. मुलांच्या या वागणुकीकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण, मुलं आक्रमक बनत असेल तर मुलाला मानसिक आजार असू शकते, हे पालकांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे. वैद्यकीय भाषेत याला ‘अटेंशन डेफिसिट हाइपर एक्टिविट डिसऑर्डर’ असे म्हणतात.हा एक मेंदूशी संबंधित समस्या आहे. लहान मुलांमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसून येतंय.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रौढां प्रमाणेच मुलेही आक्रमक होतात. परंतु फरक हा आहे की प्रौढ लोक त्यांच्या आक्रमकता, राग आणि भावनांवर चांगले नियंत्रण ठेवतात. मात्र, लहान मुलांना रागावर नियंत्रण कसे मिळवायचं हे कळत नाही. सध्या अनेक लहान मुलांमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसून येत आहे. मात्र, बऱ्याचदा आपणं मुलं ‘हाइपर एक्टिविट डिसऑर्डर’ या विकाराने त्रस्त असल्याचे कळत नाही. पण मुलांचा मुड बदलणं, चिडचिडेपणा वाढणे, नैराश्य, हिसंक बनणे ही या विकाराची लक्षणे आहेत. यामुळे मुले आक्रमक वर्तन करतात. याशिवाय जेव्हा मुलं तहानलेला असेल, भूकेलाला असेल किंवा कंटाळा आला असेल तर ते हिसंक वर्तक करतात. जसे, लाथा मारणे, चावणे, मारणे.

पालकांनी मुलांच्या स्वभावातील हे बदल लक्षात घेऊन तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. जेणेकरून मुलाला या आजारातून बाहेर काढण्यास मदत होऊ शकले. 

ही लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात 

एक जागी स्थिर न बसणे

बसल्यावर सतत हलत बसणे किंवा काहीतर करत राहणे

कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे

शांत न राहणे

सतत विनाकारण बडबड करणे

एक काम करत असताना ते सोडून दुसऱ्या कामाकडे लक्ष देणे

राग आल्यावर वस्तू फेकून देणे, चिडचिडेपणा

विशेषतः आक्रमक प्रवृत्तीच्या या मुलांना सांभाळणे हे कुटुंबियांसाठी खूपच आव्हानात्मक असते. कारण ही मुलं हिंसक झाली तर त्यांना आवरण अवघड असतं. अशा मुलांच्या वाईट वागणुकीचा सामना करण्यासाठी पालकांना खूप संयम ठेवावा लागतो. याशिवाय आपल्या मुलांमधील आक्रमकता नियंत्रणात कसे आणावेत आणि त्यांना शांत कसे करावेत हे पालकांना माहित असणे गरजेचं आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. 

१)आपल्या मुलाशी बोला:आपल्या मुलाशी संवाद साधतात त्याकडे पहा. जर आपणास असे लक्षात आले की आपले मूल आक्रमक आहे. तर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांना राग येईल तेव्हा त्यांना चिडवू नका. यामुळे त्यांचा राग आणखी तीव्र होऊ शकतो. आपल्या मुलास आक्रमकते मागील खरे कारण जाणून घ्या. आपल्या मुलांबरोबर मित्रांप्रमाणे वर्तन करा. यामुळे मुलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यास मदत मिळते. जेणेकरून मुलांच्या मनातील नकारात्मक भावना तुम्ही दूर करू शकता. मुलाला मानसिक आजार असल्याचे लक्षात आल्यावर समाज काय बोलेल याचा विचार करून आजारपण लपवू नका. यामुळे समस्या अधिक बिकट बनू शकते.  

२)मुलांना मारू नका:आपण मुलं इतर मुलांप्रमाणे सर्वसाधारण नाही, हे पालकांनी मनाशी पक्क केलं पाहिजे. कारण, जेव्हा मुलं आक्रमक वागतात त्यावेळी अनेक पालकांची चिडचिड होते. बरेच लोक मुलांना मारतात. असे करणे चुकीचं आहे. मुलं आक्रमक होत असेल तर त्यांच्यावर न चिडता त्यांची समजूत घातली पाहिजे. जेणेकरून मुलांचा राग शांत होईल. 

३)आपल्या मुलाच्या वागण्यावर त्वरित प्रतिसाद द्या:जर मुलाने नकारात्मक वागणूक दर्शविली तर त्यांना लगेच रोखायला जाऊ नये. मुलाचा राग शांत झाल्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा. 

४)तोडगा काढण्याचा प्रयत्न करा:तुमच्या मुलाबरोबर बसा आणि त्याला जे वाटते त्याबद्दल मोकळे करा. समस्येवर उपाय शोधा. आपल्या मुलास ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाच्या व्यायाम करण्याची सवय लावा. ज्यामुळे मुलाच्या मनावर नियंत्रण राहिलं. आपल्या मुलामध्ये ज्या परिस्थितीत आक्रमक होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

५)पडद्यावरील वेळ कमी करा:दूरदर्शन पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे किंवा टॅब्लेट वापरण्यात घालवलेल्या वेळेमुळे मुले आक्रमक किंवा हिंसक होऊ शकतात. आपल्या मुलास सामोरे जाणाऱ्या सामग्रीचे नियमन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे. टीव्ही पाहण्यासाठी किंवा व्हिडिओ गेम खेळण्यासाठी वेळापत्रक सेट करा. मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. आपल्या मुलांसाठी माहितीपूर्ण प्रोग्राम निवडा किंवा त्यांच्याबरोबर मैदानी किंवा घरातील खेळ खेळा.

६)मुलांना प्रोत्साहन द्याःआपल्या मुलास बक्षीस देणे खूप महत्वाचे आहे. आपल्या मुलामध्ये सकारात्मक वर्तनात्मक बदल लक्षात घेतल्यास, चांगल्या वर्तनासाठी त्याचे कौतुक करा. जेणेकरून मुलाला प्रोत्साहन मिळेल.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट