राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास ती गुजरातपासून सूरू झाली पाहिजे-खासदार संजय राऊत

मुंबई :राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ठाकरे सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी काल २५ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट दरम्यान केली होती. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे,’ असे मत त्यांनी मांडले.

संजय राऊत म्हणाले, ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे. गुजरातमधील उच्च न्यायालयाने कोरोना हाताळण्या संबंधी निष्कर्ष काढला आहे, ते गंभीर आहे. सरकारी रुग्णालये अंधारी कोठड्या झाल्या आहेत. रुग्णालयांची स्मशाने झाली आहेत, असे गुजरातच्या न्यायालयाने सरकारचे कान टोचले आहेत. तेथील राज्यपांलनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज दिली पाहिजे आणि विरोधकांना पण मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे.

महाविकसाआघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार

हे राज्य सर्वांचे आहे, राज्य संकटात असताना सर्वांनी एकत्र येणे गरजेचे, इतर राज्यात सर्वजण एकजुटीने लढत आहेत. पण, महाराष्ट्रात तसे घडताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘महाराष्ट्राचे सरकार, ठाकरे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचे बनले आहे. महाविकसआघाडी सरकार संपूर्ण ५ वर्षांचा कालखंड पार पाडणार असून पुढिल निवडणुकाही आम्ही एकत्रच लढणार आहोत.’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

'कोरोना'वरची 'लस' आणि ठाकरे सरकार पाडण्याचा 'डोस' विरोधकांना सापडायचाय आहे खासदार संजय राऊत

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक चिंतेत असताना राज्य सरकारमध्ये राजकीय खलबते चालली असल्याचे दिसून आले आहे. शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीतील महत्वाचे दुवा असलेले संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चर्चेला पुष्टी मिळाली आहे. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, स्थिरतेबाबतच्या अफवा निव्वळ पोटदुखी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या काळात अनेक दिवस माध्यमांपासून दूर असलेल्या खासदार नारायण राणे यांनी काल राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने चर्चेला ऊत आला आहे.त्यानंतर काल शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे.चिंता नसावी, असे ट्वीट राउत यांनी केले आहे. 'कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. बुमरँग…' असे ट्वीटही त्यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट