आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची २५०० रिक्त पदे तत्काळ भरणार

संघटनेचे अध्य़क्ष भाऊसाहेब पठाण यांची माहिती

मुंबई :वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त रूग्णालयातील गट-ड (चतुर्थश्रेणी) ची रिक्त २५०० पदे भरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करणा-या राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस प्रकाश बने यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे आभार मानले आहेत. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील रूग्णालयांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने रूग्णसेवा पुरविण्यासाठी मनुष्यबळ अपूरे पडत असून कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गा्‍यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यासाठी सर्व रूग्णालयांमधील चतुर्थश्रेणीची रिक्त पदे भरण्याबाबत व कार्यरत कर्मचा-यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी भाऊसाहेब पठाण तसेच जे. जे. रूग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे, कामा व आल्ब्लेस रूग्णालयाचे बाबाराम कदम व इतर पदाधिका-यांसमवेत या विषयावर चर्चा झाली.


यावेळी चतुर्थश्रेणीची २५०० रिक्त पदे भरण्याचा तसेच भरतीमध्ये कार्यरत असलेल्या बदली कर्मचा-यांना कायम करणे, वारसाहक्क यादीतीलव  अनुकंपा तत्वारील रखडलेल्या उमेदवारांना प्राधान्य देणे याला सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र बदली कामगार वगळता इतर जागा भरताना त्या कंत्राटी पध्दतीने भरणार ही बाब उचित नसल्यामुळे अशा पद्धतीने भरती केलेल्या कर्मचा-याचे कंत्राट संपल्यावर त्यांना नोकरीस मुकावे लागेल आणि त्यांचे भविष्य धोक्यात येईल, त्यासाठी कंत्राटी पध्दतीने भरती करण्यास आमच्या महासंघाचा विरोध असून सदर भरती कंत्राटीऐवजी सरळसेवेने कायमस्वरूपी करण्यात यावी अशी विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली.


जे कर्मचारी कर्तव्यावर हजर होत नाहीत ते मुद्दाम अथवा जाणीवपूर्वक येत नाहीत असे नसून त्यांना लॉकडाऊनच्या अडचणीमुळे येणे शक्य होत नाही तसेच राज्यातील कांही रूग्णालयांमध्ये फक्त डॉक्टरस्, स्टाफ नर्स, सिस्टर/ब्रदर्स यांनाच राहण्याची सोय केली असून चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना रूग्णालयात राहण्याची व्यवस्था नाही. अशाने त्यांची राहण्याचीही गैरसोय होते. त्यामुळे वर्ग-४ कर्मचार्‍यांना कर्तव्यावर येणे शक्य होत नाही, ही बाब देखील यावेळी ध्यानात आणून दिली गेली. मुंबईतील कर्मचारी हे  बदलापूर, आसनगाव,  कसारा, पनवेल, विरार, पालघर अशा दूरवरच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यांना प्रवासासाठी वाहनसेवा ऊपलब्ध नाही. तरी आपल्या प्रशासनाने चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना कार्यालयीन वेळेनुसार ने-आण करण्यासाठी वाहनसेवा व त्यांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर व इतर आवश्यक सोयीसूविधा  पुरविल्यास आणि राहण्याची सोय केल्यास ते तात्काळ रूजू होण्यास तयार आहेत. तरी सदर सोयी सुविधा ऊपलब्ध करून द्याव्यात अशीही विनंती यावेळी केली गेली.


कार्यरत कर्मचा-यांपैकी ८० ते ९०% कर्मचारी पन्नास-पंचावन्न वर्षांवरील वयोगटातील असून, वयस्कर व्यक्तींना कोरोनाची बाधा लवकर जडते, म्हणून ५५ वर्षावरील कर्मचा-यांना कोरोनासंबधीत कामापासून शासनाने सूट दिलेली आहे. त्यानुसार ५०-५५ वर्षे वयोगटातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनाा कर्तव्यात सूट देण्यात यावी, अशीही मागणी संघटनेच्या वतीने केली गेली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट