
उल्हासनगरातील कोरोना बाधित महिलेच्या २८ नातेवाईकाना केले क्वॉरनटाईन .
- by Rameshwar Gawai
- Apr 30, 2020
- 787 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील फालवर लाईन येथील २८ एप्रिल २०२० रोजी ८७ वर्षीय मयत महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले असुन तिच्या २८ नातेवाईकाना महापालिकेने क्वॉरंटाईन केल्याने त्या भागातील रहिवाशांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या शिवाय एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे सुद्धा चिंता वाढली आहे .दरम्यान सात दिवसानंतर कोरोना रोगाची लक्षणे दिसत असल्याने क्वॉरनटाईन करण्यात आलेल्या जवळच्या संपर्काचे नमुने चार ते पाच दिवसानंतर घेऊन पाठविले जाणार आहेत.
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील यापूर्वी चाचणीसाठी पाठवलेल्या आणखी आठ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवालांचे कोरोना निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक पोलिस कर्मचारी यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पोलीस कर्मचार्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या अहवालांचा विचार करतात आज शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.
उल्हासनगर शहरातील डेडिकेटेड कोव्हिड १९ हॉस्पिटलमध्ये एकूण १२ रूग्ण असून यापैकी ११ कोरोनाग्रस्त तर १ सार बीको रूग्ण आहे. तर ११ रुग्णांपैकी ५ रुग्ण उल्हासनगर शहरातील एकाच कुटुंबातील असून ५ रुग्ण बदलापूरचे आहेत व १ रुग्ण कल्याण येथील आहे. रुग्णालयात सर्व प्रकारे खबरदारी घेतली जात असल्यामुळे कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नसल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यानी सांगितले आहे . तर सर्वांच्या प्रकृती उत्तम असून ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार किमान दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर टप्प्याटप्प्याने या रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल अस ही आयुक्तानी सांगितले आहे .
वेळेत उपाययोजना केल्यास कोरोना पूर्णपणे बरा होतो. मात्र भीतीपोटी आजार दडविल्यास त्याचे न्युमोनियामध्ये रूपांतर होऊन या रुग्णाच्या जीवितास धोका पोहोचतो. तसेच हा रुग्ण उपचाराविना बाहेर राहिल्यामुळे त्याचा व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रादुर्भाव होऊन साथ रोगाच्या प्रसारास मदत होते. त्यामुळे कोरोना रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी ताबडतोब महानगरपालिकेच्या स्थापन केलेल्या फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करणे आवश्यक आहे.
शहरात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अशा प्रकारची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन स्वतः तपासणी करून घेतल्यास भविष्यात या रोगाचा प्रसार थांबविण्यास व पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास प्रशासनास यश येईल असा विश्वास आयुक्तानी व्यक्त केला आहे
१ मे २०२० पासून फळे व भाजीपाला विक्रीसाठी दुपारी २ वाजेपर्यंतच अनुमती देण्यात येणार आहे. तथापि ही फळे व भाजीपाल्याची विक्री केवळ ज्या विक्रेत्यांना महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकारी यांनी परवानगी दिली आहे त्यांनाच केवळ प्रभाग अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या जागेवर करता येईल. परवानगी नसलेले किंवा ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त विक्री व्यवसाय करणारे फळे व भाजीपाला विक्रेते यांचे संपूर्ण साहित्य व दुकान किंवा हातगाडी तात्काळ जप्त करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तानी भाजीपाला व फळ विक्रेत्याना दिला आहे .
उल्हासनगर- ५ येथील एक, जिजामाता कॉलनी संभाजी चौक येथील एक व फालवर लाईन येथील एक अशा तीन कंटेनमेंट झोनच्या नियमांचे सर्व नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे. ही सक्ती कुणाला त्रास देण्यासाठी नसून सर्वांच्या भल्यासाठी व रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनास व महानगरपालिकेस सर्वांनी सहकार्य करन्याचे आव्हान आयुक्तानी नागरिकाना केले आहे
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम