
लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबईत होऊ शकतात कोरोनाचे ५०,००० रुग्ण होतील अशी भीती-डाॅ तात्याराव लहाने’
- by Adarsh Maharashtra
- Apr 20, 2020
- 1234 views
मुंबई : कोरनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात देशातले सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात मुंबई हॉटस्पॉट ठरलं आहे. लॉकडाऊन मुळे सगळे आता घरात बंद आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यशही आलं आहे. पण लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. एकट्या मुंबईतच कोरोनाचे ५० हजार रुग्ण होतील अशी भीती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली आहे. सध्या लॉकडाऊन आहे सर्वत्र शांतता आहे.
मात्र ३ मेनंतर जर लॉकडाऊन हटविण्यात आला तर पुन्हा सगळे कामावर परत जातील आणि ही संख्या वाढू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट करून रुग्णांना आयसोलेट करा आणि उपचार करा असा सल्लाही दिला जात आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून संख्याही तब्बल ४४८३ वर पोहोचली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम