.तर सहा महिन्यांचा तुरुंगवास

महाराष्ट्रात साथरोग प्रतिबंधक कायद्याची अमलबजावणी सुरू

पुणे(प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने आता गर्दी टाळण्यासाठी तसेच घातलेल्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रात एपीडमीक लॉ अर्थात साथरोग प्रतिबंधक कायद्याची अमलबजावणी सुरू झाली असून या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ४३ झाली असून काल मुंबईत आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला मात्र राज्यातील कोरोना बधितांची प्रकृती स्थिर आणि नियंत्रणाखाली असल्याचे काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.काल पुण्यात आरोग्य मंत्र्यांनी एनआयव्ही तसेच नायडू रुग्णालयात भेट दिली तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की येत्या १० दिवसात ८ नव्या लॅब सुरू केल्या जाणार असून गुरुवारपासून ८० ते १०० कोरोना टेस्ट केल्या जातील तसेच केईएम, बीजे (पुणे)आणि कस्तुरबा मध्ये ३ नव्या लॅब सुरू केल्या जाणार आहेत त्याच बरोबर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी डॉकटर आणि तज्ञ नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सध्या जे ४३ रुग्ण आहेत त्यातील केवळ ९ स्थानिक असून उर्वरित बाहेरून आलेले आहेत या कोरोना बाधित अथवा संशयित रुग्णांच्या विलिगीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित राबवली जात असून त्यासाठी काही हॉटेल्स मध्येही कक्ष उघडण्यात आले आहेत त्याचबरोबर कोरोनाच्या उपचार प्रक्रियेसाठी केंद्राकडून आवश्यक ती मदत मिळणार असून त्यात १० लाख किट्सचां समावेश आहे. दरम्यान लोकांनी गर्दी टाळणे आवश्यक असून जर गर्दी कमी झाली नाही तर सार्वजनिक परिवहन सेवांबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल म्हणजेच लोकल आणि बसेस बंद कराव्या लागतील असा इशाराही त्यांनी दिला. बाहेरच्या देशातून येणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्याबाबत विचारले असता आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तसे करता येत नाही मात्र हा केंद्राच्या अखत्यारीतील विषय असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काल क्वारनटाईन केलेले ४ प्रवाशी गरीब रथ एक्स्प्रेसने प्रवास करताना आढळले मात्र त्यांच्या हातावरील शिक्का बघून त्यांना पालघर रेल्वे स्थानकात उतरवण्यात आले ते सुरतकडे निघाले होते आता त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

रेल्वे, बसची प्रवासी क्षमता कमी करणार- मुख्यमंत्री

काल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वे आणि बसेस मधील प्रवाशी संख्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय तसेच सरकारी कार्यालये सुद्धा ५० टक्के कर्मचाऱ्यांवर चालवली जाणार आहे दुकानांच्या वेळाही ठरवल्या जाणार आहेत.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट