बिहार निवडणूक अशी होणार, ऑनलाइन नामांकन,ग्लव्हज घालून मतदान

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट : कोरोना काळात निवडणूक कशी घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली जारी केल्या आहेत. गाइडलाइन्स नुसार उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. निवडणूक काळातील कामादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

काही दिवसांमध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने राजकीयपक्षनिवडणुकीच्या कामाला लागले आहे.साहजिकच निवडणूक आयोगा कडूनही याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात डोर टू डोर कँपेनिंग करताना उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त 5 लोकांना नेऊ शकणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सभा आणि रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून स्पष्ट केले की, यावेळी उमेदवार सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाइन जमा करू शकतील.देशातील निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच कुठलाही उमेदवार हा सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाइन जमा करतील. त्याशिवाय ,विधानसभेच्या उमेदवारांचे नामांकनही ऑनलाइन भरता येईल.

दरम्यान, निवडणुक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकी साठी होणाऱ्या घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत केवळ पाच जणांना जाण्याची परवानगी असेल. तसेच केंद्रीय गृहमंत्रालाने दिलेल्या सूचनांनुसारच सभा आणि रोड शोंना परवानगी देण्यात येईल. तसेच निडणुकी दरम्यान, कोरोना संकट विचारात घेऊन सावधगिरी बाळगण्याची सूचना निवडणुक आयोगाने केली आहे. निवडणूक काळात फेस मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ग्लव्हज, पीपीई किट्सचा वापर निवडणूक प्रक्रियेदरम्यान केला जाईल. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालक करण्यात येईल

कोरोना विषाणूच्या फैलावाची भीती विचारात घेऊन व्होटर रजिस्टर असाइन करण्यासाठी सर्व मतदारांना ग्लव्स देण्यात येतील. मतदारांना ईव्हीएम मशीनमध्ये मतदान करण्यापूर्वी गरज पडल्यावर ओळख पटवण्यासाठी फेसमास्क हटवावा लागेल.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट