मुंबई काँग्रेस तर्फे ऑगस्ट क्रांती मैदान येथे स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली

मुंबई : मुंबईच्या गावालीय टॅंक मैदानात महात्मा गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी ऐतिहासिक भाषण केले होते या भाषणात त्यांनी करो या मरोचा नारा दिला होता. भारत छोडो आंदोलन सुरू होताच ब्रिटिश सरकारने. महात्मा गांधी अब्दुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या मोठ्या नेत्यांना अटक केली होती. या मैदानातन स्वातंत्र्य लढ्याची क्रांती घडल्यामुळे या मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान असे नाव देण्यात आले. भारत छोडो आंदोलनाला आज ८२ वर्ष पूर्ण होत आली आहेत 


त्यानिमित्त मुंबई काँग्रेसच्या वतीने गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला वंदन करून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी श्री जी जी पारेख, तुषार गांधी, उपस्थित होते.अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदानात झेंडा वंदन करून स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यानंतर तेजपाल सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी भाजपा मंत्र्यांनचा कारभारा विषयी बोलून त्यांचा चांगला समाचार घेतला.


यानंतर जमलेली सर्व मंडळीं गावदेवी येथील महात्मा गांधीजींनी १९१७ ते १९३४ या कालखंडात ज्या मणी भवन वास्तूत मुक्काम करून हिंदू मुस्लिम दंगली थांबण्याकरता ऐतिहासिक उपोषण सुरू केले होते. स्वराज्यासाठी असहकार आंदोलन आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता.त्या ऐतिहासिक मणी भवनला भेट दिली. याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेटिवार, माजी मंत्री अनिस अहमद,आमदार भाई जगताप, अमीन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मधु चव्हाण, चरणजित सिंग सप्रा असे ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन!

आत्मब लिदानातून‌ मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्याचे मोल जपण्याचे काम नव्या पिढीला करावे लागेल,असा विश्वास शिवसेना युवानेते माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केला आहे.शिवसेनेचे उपनेते,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनीही हुतात्म्यांना अभिवादन केले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने आज ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त नाना चौक येथून कामगारांची मूक मिरवणूक गवालिया टॅंक मैदानापर्यंत काढण्यात आली.युवासेनानेते आदित्य ठाकरे,रामिम  संघाचेअध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मूक मिरवणूक गवालिया टॅंक मैदाना पर्यंत नेण्यात आली.तेथे मान्यवर नेत्यांच्या वतिने हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहिल्या नंतर, विनम्र अभिवादन करण्यात आले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गेली ७५ वर्षे हा अभिवादनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.रामिम संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड,सुनिल अहिर, मिलिंद तांबडे,किशोर रहाटे,साई निकम आदी पदाधिकाऱ्यांनी  हुतात्म्यांना अभिवादन केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट