कर्जत किरवली येथे इनोव्हा कारचा पुलावरून पडून अपघात, पत्रकार धर्मानंद गायकवाडसह दोघांवर काळाची झडप तर दोन जण जखमी

कर्जत - सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, निर्भीड पत्रकार असा नावलौकीक असणारे दैनिक आदर्श महाराष्ट्रचे रायगड जिल्हा प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद गायकवाड यांच्या इनोव्हाकारचा आज दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास किरवली गावाच्या हद्दीतील कर्जत - कल्याण राज्य मार्गावरील पनवेल - कर्जत रेल्वे लाईन वरील पुलावरून खाली पडून अपघात झाला . या अपघाता मध्ये पत्रकार धर्मानंद गायकवाड  व त्यांच्या दोन मावस भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इनोव्हा कार मधिल इतर दोन जण जखमी झाले असून , त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कर्जत तालुक्यातील धर्मानंद यशवंत गायकवाड यांचे मुळ गाव असल असुन, ते सध्या नेरळ मधिल राजेंद्रगुरू नगर येथे स्थायिक होते. धर्मानंद गायकवाड यांनी पत्रकारीमध्ये आपला चांगलाच ठसा उमटवला होता. तर ते नेरळ ग्रामपंचायती विद्यमान सदस्य तसेच ते आरपीआय पक्षाचे रायगड जिल्हा संर्पकप्रमुख पदाची जबाबदारी संभाळत होते. धर्मानंद गायकवाड हे त्यांची इनोव्हा कार नंबर एमएच.बीआर. ४२६१ मधून त्यांचे मुंबई व ठाणे येथील मावस भाऊ व त्यांचे दोन मित्र यांच्या सह दि. ६ नोव्हेंबर रोजी मध्य रात्रीच्या सुमारास  मुंबई - पनवेल मार्गे नेरळ कडे प्रवास करीत असताना, दि. ७ नोव्हेंबरच्या अंदाजे पहाटेच्या ३.३० ते ४.०० वाजण्याचे सुमारास चालकाचा ताबा सुटला आणि त्यांची इनोव्हा कार  कर्जत - कल्याण राज्य मार्गावरी पनवेल - कर्जत  रेल्वे लाईन वरील असलेल्या पुलावरून साधारण ३५ ते ४० फुट खाली पडली . त्याचवेळेला कर्जत - पनवेल रेल्वे लाईनवरून कर्जत स्थानकाच्या दिशेने मार्गस्त असलेल्या मालगाडीला जाऊन त्यांची इनोव्हा कार धडकली असल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघाता मध्ये पत्रकार धर्मानंद यशवंत गायकवाड वय वर्ष ४१, रा. नेरळ यांच्यासह त्यांचे मावसभाऊ मंगेश मारिया जाधव वय वर्ष ४६ राहणार  मुंबई व नितिन मारूती जाधव वय वर्ष ४८, राहणार ठाणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचे  पत्रकार मित्र जयवंत हाबळे व सहकारी संतोष जाधव हे जखमी झाले असून, पत्रकार जयवंत हाबळे यांच्यावर पनवेल येथील पुरोहीत हॉस्पिटलमध्ये तर त्यांचे सहकारी संतोष जाधव यांना एमजीएम रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट