
मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल होणार?
- by Adarsh Maharashtra
- Dec 01, 2018
- 1792 views
मुंबई: मराठा आरक्षणाला काही संघटनांचा होता. राज्य सरकारने एसीबीसी प्रवर्ग तयार करुन मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी आता सुरु झाली आहे.
सोमवारी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण पुन्हा अधांतरी राहण्याचे चिन्हे दिसत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण विधेयकाला स्थगिती द्यावी, असं पत्र ‘इंडियन कॉन्स्टिटयूशयनल कौन्सिल’च्या सदस्य डॉ. जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत राज्यपालांना लिहिलं होतं.
दरम्यान, राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी करून मंजुरी दिल्यामुळे अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम