धनगरानों! आता भंडारा तयार ठेवा....भारत कवितके.

मुंबई : आज काल कुणीही उठसूठ उठायचे आणि धनगर समाज्याच्या आरक्षण अमंलबजावणीचा संबंध त्याच्या प्रोपटीशी लावायचा आणि खोडसाळपणे,अज्ञानापणे प्रसिद्धि साठी भाष्य करुन मोकळे व्हायचे म्हणे धनगर समाज पहिल्यापासूनच सधन असल्यामुळें त्यांना आरक्षणाची आवश्यकता  नाही,स्वत: चे जेवनाचे ताट परिपूर्ण भरलेले असताना शेजारच्या  रिकाम्या ताटात काहि वाढू नका,ही हीनवृत्तीची भाषा करतात अहो,ही आपली विकृति आहे,संस्कृती नाही स्वत:ला प्रसिद्धिच्या झोकात मिरविण्यासाठी असे काहीतरी बोलावे लागते त्यांना.आमचा धनगर समाज बांधव तसा अजूनही खूपच सहनशिल,संयमाने वागणारा,पोस्टर फाडणे जाळणे,तुडविणे,जोडे मारणे ,निवेदने देणे,व जाहिर निषेध करणे,या पलीकडे आमचा धनगर समाज बांधव तसा अजूनही गेला नाही,जेवढी आक्रमकता दाखवायला पाहिजे  तेवढी दाखवित नाही,यांचा अर्थ आम्ही काही करु शकत नाही,असा कुणीही घेऊ नये. आरक्षणाच्या अमंलबजावणी चा राजकारणी लोकांनीही अक्षरश: खेळखंडोबा करुन ठेवलाय,संविधानाने दिलेल्या सवलती पासून आम्ही वंचीत आहोत.आमची आरक्षण अमंलबजावणी होणेच योग्यच आहे,हे अनेक मार्गाने दाखवून देऊन सुध्दा उलट आमच्या बाबतीत चीड आणणारी विधाने केली जातात,आमचा कोणत्याही जातीजमातीच्या कसल्याच सवलतीला विरोध नव्हता आणि नाहीही.मग आमच्या आरक्षण अमंलबजावणीला विरोध का? संविधानाने दिलेले आमच्या पदरी नको का?आमचा तो हक्क आहे,भीक नाही,इतर जाती जमातीतील राजकारणी लोकांनी धनगर समाज बांधवांच्या आरक्षणा संदर्भात अशी वृत्ती ठेऊ नये.आम्हाला तुमच्या सगळ्या प्रकारच्या विरोधाला विरोध करण्याचे बळ आहे,पण आम्ही  संशयाने,सहनशिलतेने वागतोय.धनगर समाज बांधवांनो,मल्हारराव होळकर,यशवंतराव होळकर यांचे आपण वारसदार, भारत देशाच्या गौरवशाली इतिहासात धनगर समाजाचे मोठे योगदान आहे,आपण रडायचे नाही,तर नेहमी लढायचे.महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,महाराष्ट्र राज्य,मुंबई व्दारा,. शिंद सर,पाचपोळ सर ,बघेल सर,व इतर संस्था जीवाचे रान करुन कायद्याने न्यायालयीन लढाई लढत आहेत,पुराव्याचा व कायद्याचा किस पाडत लढत आहेत .यांचाच परिणाम म्हणजे आता आरक्षण अमंलबजावणी न्यायालयीन निकाल अंतीम टप्प्यात येऊन पोहचला आहे,येत्या १६ फेब्रुवारी २०२३ रोजी अंतीम निकाल लागणार आहे,या पाश्र्वभूमीवर इतर जातीजमाती विनाकारण आपल्या समाजा विरुध्द झाल्या आहेत.पण माझ्या समाज बांधवांनों,निकाल आपल्याच बाजूने लागेल,विजय आपलाच होणार,यात शंका नाही,भंडारा उधळण्यासाठी,महाराष्ट्र  भंडाराने पिवळा करण्यासाठी,आनंदाने निकालाचे स्वागत करण्यासाठी,धनगरानों! आता भंडारा तयार ठेवा....विजय आपलाच आहे...


संबंधित पोस्ट