
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन
राष्ट्रीय युवा दिनाच्याही दिल्या शुभेच्छा
- by Adarsh Maharashtra
- Jan 12, 2021
- 866 views
मुंबई, दि.१२ : स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे विश्र्वदूत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात नमूद केले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, स्वामी विवेकानंद यांनी हिंदू संस्कृती आणि सभ्यता जगभरात पोहचविण्यासाठी संपूर्ण जीवनच समर्पित केले. आचार, विचार, व्यवहार याबाबत त्यांनी सहज सोप्या भाषेत आणि तितक्याच स्पष्टपणे मांडणी केली. ही मांडणी आजच्या युवा पिढीसह येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करणारी ठरेल अशीच आहे. भारतीय संस्कृती आणि त्यातही हिंदू संस्कृती, सभ्यता जगभरात पोहचविण्यासाठी ते भारताचे विश्र्वदूत होते आणि यापुढेही राहतील. त्यांचे विचार आणि जीवन हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणा दायी असेच आहेत. त्यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही विविध कार्यक्रम, उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा.
स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम