रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला चौघांचा जागीच मृत्यूतर दोन मृतदेह सापडले

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर घडला अपघात

रायगड  : भीषण अपघात झाला असून वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला आहे. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर झाला वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात झाला आहे. हा ट्रक रत्नागिरी येथून पोलादपूरला जात असताना हा अपघात झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. घटनास्थळी दोन मृतदेह सापडले असून २० ते २२ लोक जखमी झाल्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बोलताना दिली आहे.

या ट्रकमध्ये जवळपास २५ लोक प्रवास करत होते.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि ट्रेकर्स दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरु असून अंधार असल्याने अडथळा येत आहे.तर जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. तसंच रक्ताची गरज भासेल यासाठी ब्लड बँकेलाही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट