मुंबईतील गिरणी कामगारांना घरे तात्काळ उपलब्ध करुन द्यावी - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई, दि. 6 : मुंबई शहरामध्ये एसआरएच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन दिली जातात त्याचप्रमाणे गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे तातडीने उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिले.

मुंबईतील गिरणी कामगारांना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याबाबत विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (1) भूषण गगराणी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष बोबडे, कामगार विभागाचे सह सचिव स.मा. साठे, कामगार उपायुक्त गिरीश लोखंडे, गृहनिर्माण उपसचिव रा.को. धनावडे, अवर सचिव अरविंद शेठे, यांसह गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष बी.के. आंब्रे, उदय भट, तसेच गिरणी कामगार उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले म्हणाले, मुंबईतील गिरणी कामगारांच्या जमिनी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन झालेली आहे. गिरणी कामगारासाठी सध्याला 1 लाख 74 हजार अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये काही दुबार नावे आली आहेत. त्या अर्जाची छाननी तातडीने करावी. तसेच गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच जमीन उपलब्ध करुन त्याचे पुनर्वसन मुंबईतच  करावे, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.

गिरणी कामगारांसाठी 2001 मध्ये शासनाने धोरण निश्चित केले असून या धोरणाची अंमलबजावणी तातडीने पूर्णत्वास न्यावी, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट