बिहार मध्ये परत एकदा भाजपाचे कमळ उमलले

नाशिक,  : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने  जोरदार आघाडी घेतली आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी 'बिहार तो एक झाकी है, महाराष्ट्र-बंगाल अभी बाकी हैं' अशा घोषणा देत पेढे वाटून जल्लोष केला आहे.

नाशिकमधील वसंत स्मृती भाजप कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकच जल्लोष केला आहे. बिहारमध्ये भाजपने जास्त जिंकून मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली होती.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. आता पर्यंत एनडीएने 4 वाजेपर्यंत 40 जागांवर विजय मिळवला आहे. तर जदयूने  12 जागांवर आणि भाजपने 26 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 27 जागा जिंकल्या आहेत.

भाजपने पहिला विजय हा दरभंगातील केवटी मतदारसंघातून मिळवला आहे.  भाजपचे उमेदवार मुरारी मोहन झा हे विजयी झाले आहे. त्यांनी राजदचे उमेदवार अब्दुल सिद्दिकीचा पराभव केला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघातून आघाडीवर असलेल्या जागा आता विजयात रुपांतरीत झाल्या आहे. आतापर्यंत भाजपने 16 जागा जिंकल्या आहेत.  भाजप 72 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडयू 46 जागांवर आघाडीवर आहे. एनडीएने सर्वाधिक 124 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागत असलेल्या 122 जागांचा आकडा एनडीएने पार केला आहे.

आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आधारावर भाजप आणि जदयू यांच्या  एनडीए ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असं भाजप नेतेही सांगू लागले आहेत. पण निवडणूक आयोगाने आत्ताच दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 25 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. अजूनही 4 कोटी मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे निकाल फिरण्याचीही शक्यता आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट